नाशिक : अशोक स्तंभ जवळील अतिशय दाट वस्तीच्या भागात मंगळवारी सकाळी जुना वाडा आगीत भस्मसात झाला. या वाड्यात कोणी वास्तव्यास नव्हते. परंतु, लगतच्या वाड्यातील पाच ते सहा कुटुंबांना अग्निशमन दलाने सुरक्षित बाहेर काढले. अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

रविवार पेठेतील कंसारा मंगल कार्यालयासमोर जुनी तांबट अळीत हा वाडा आहे. विठ्ठलभाई तांबट यांचा हा जुना वाडा पडिक स्वरुपात आहे. तिथे कोणी रहात नव्हते. पहाटे साडेपाच वाजता या वाड्यास आग लागली. ही बाब लक्षात येताच आसपासच्या नागरिकांनी या घटनेची माहिती पंचवटी अग्निशमन दलास दिली. काही वेळात या केंद्राचे दोन व मुख्यालयाचा एक असे तीन पाण्याचे बंब घटनास्थळी दाखल झाले. मध्यवर्ती भागातील अतिशय दाट वस्तीचा हा परिसर आहे.

2 children die after father throws them in river in nashik
तापी नदीत पित्याने फेकल्याने दोन मुलांचा मृत्यू
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
road accident on Mumbai Nashik highway
मुंबई नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ठाणे, भिवंडी कोंडले
nashik firing news in marathi
नाशिक : गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमधील वादात गोळीबार, वाढत्या गुन्हेगारीने रहिवासी त्रस्त
cidco protest for water news
नाशिक : सिडकोत पाण्यासाठी आंदोलन, महापालिकेचा निषेध
mhada nashik lottery
म्हाडाच्या नाशिक मंडळाच्या ४९३ घरांसाठी मार्चमध्ये सोडत, २० टक्के योजनेतील घरांसाठी दोन ते तीन दिवसांत जाहिरात
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती

हेही वाचा…मंत्रिमंडळाआधीच पालकमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी, अजित पवार गटाची शिंदे गटासह भाजपला शह देण्याची तयारी

आग लागलेल्या वाड्याजवळील दुसऱ्या वाड्यात पाच ते सहा कुटुंब वास्तव्य करतात. प्रारंभी त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाचे संजय कानडे यांनी दिली. ज्या वाड्याला आग लागली, त्याच्या बांधणीत मोठ्या प्रमाणात सागवानी लाकडाचा वापर झालेला आहे. त्यामुळे आग पसरली. तिच्यावर नियंत्रण मिळवण्यास बराच वेळ लागला. अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंंतर आग नियंत्रणात आली. तोपर्यंत वाड्याचा बराचसा भाग भस्मसात झाला होता. आग विझवल्यानंतरही वाड्यातील लाकूड अधुनमधून पेट घेत होते. त्यामुळे बराच वेळ पाण्याचा मारा करावा लागला. आग नेमकी कशामुळे लागली त्याची स्पष्टता झालेली नाही. या दुर्घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही. जुन्या वाड्याच्या दोन्ही बाजुने पाणी मारून आगीची झळ आसपासच्या भागाला बसणार नाही याची दक्षता घेण्यात आल्याचे या विभागाचे के. पी. पाटील यांनी सांगितले

Story img Loader