नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी, सुरगाणा, पेठ व त्र्यंबकेश्वर या घाटमाथा क्षेत्रात पुरेसा पाऊस नसल्याने भाताची पेरणी अतिशय संथपणे पुढे सरकत आहे. आतापर्यंत केवळ २७.३१ टक्के पेरणी झाली आहे. यंदाच्या हंगामात सरासरीच्या तुलनेत सर्वात कमी पाऊस सुरगाणा, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्वर या तालुक्यांत झाला आहे. मुळात घाटमाथ्यावरील या भागात दरवर्षी मुसळधार पाऊस होतो.

पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आणि मागील महिन्यात पाऊस पडल्यानंतर त्यात बराच खंड पडल्याने भाताची पेरणी अडचणीत येण्याची भीती व्यक्त होत आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यात भाताचे ८७ हजार ४८८ हेक्टर इतके सरासरी क्षेत्र आहे. आतापर्यंत २३ हजार ८९० हेक्टरवर म्हणजे २७.३१ टक्के पेरणी झालेली आहे. घाटमाथा क्षेत्रात अधिक्याने भाताची लागवड केली जाते. त्यासाठी मुसळधार पाऊस लागतो. जूनमध्ये झालेल्या पावसात काहीअंशी पेरणी झाली होती. परंतु, नंतर पावसात खंड पडला. अलीकडेच उपरोक्त भागात तीन दिवस संततधार सुरू होती. यामुळे भाताच्या पेरणी क्षेत्रात सुमारे २० टक्के वाढ होऊ शकली परंतु, आजही बऱ्याच भागात मुसळधार पावसाची प्रतिक्षा आहे.

nashik Crowd management preparations for Kumbh Mela are based on Ramani Commissions reports
नाशिकच्या कुंभमेळ्यातील गर्दी व्यवस्थापनासाठी रमणी अहवालाचा आधार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती ( छायाचित्र - लोकसत्ता टीम )
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
Loksatta explained Why and how much did milk collection increase
विश्लेषण :राज्यात दुधाचा महापूर?
Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी

हेही वाचा…नाशिक महापालिकेच्या जागेवर भ्रमणध्वनी मनोरे, भाडेतत्वावर देण्यासाठी १० जागा निश्चित

जिल्ह्यात ७६ टक्के पेरणी

जिल्ह्यात मुख्य पिकाखालील सहा लाख ५८ हजार ९१ सरासरी पेरणी क्षेत्र असून त्यातील पाच लाख एक हजार २३४ हेक्टर म्हणजे ७६ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारी (२१ टक्के), बाजरी (५७ टक्के), नाचणी (१६), मका (१०९), इतर तृणधान्य (२५) . तूर (३४), मूग (११७):, उडीद (१७), इतर कडधान्ये (५४), कारळे (१.७१), सोयाबीन (१३०). इतर गळीत धान्य (१.३४), कापूस (६६) अशी पेरणी झालेली आहे.

Story img Loader