नाशिक : उन्हाच्या तीव्रतेसह पाणी टंचाईचे चटके सर्वत्र जाणवत असताना जिल्ह्यातील धरणसाठा वेगाने कमी होत असून एप्रिलच्या प्रारंभी लहान-मोठ्या २३ धरणांमध्ये २० हजार ५६१ दशलक्ष घनफूट म्हणजे केवळ ३१.३१ टक्के जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा १५ टक्के कमी जलसाठा आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ४७ टक्के जलसाठा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पावसाअभावी यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरली नाहीत. समन्यायी तत्वावर पाणी वाटपाच्या सूत्राने जिल्ह्यातील काही धरणांमधून मराठवाड्यातील जायकवाडीसाठी पाणी द्यावे लागले होते. एकूण गरज वाढत असताना जलसाठ्याचे घटते प्रमाण यंदाचा चिंतेचा विषय ठरला आहे. गेल्या वर्षीचा विचार करता यंदा धरणांमध्ये १० हजार दशलक्ष घनफूट इतका कमी जलसाठा आहे. गतवर्षी एप्रिसच्या प्रारंभी धरणांमध्ये ३० हजार ५४० दशलक्ष घनफूट (४६.५१ टक्के) जलसाठा होता. एक-दोन धरणांचा अपवाद वगळता जवळपास सर्वच धरणांतील जलसाठा निम्याहून कमी झाला आहे. पालखेडमध्ये (६१ टक्के) व नांदूरमध्यमेश्वर बंधारा (९८) हे वगळता कुठल्याही धरणात ५० टक्क्यांपेक्षा जास्त जलसाठा नाही. काश्यपीमध्ये ८४४ दशलक्ष घनफूट (४५), गौतमी गोदावरी ७०२ (३७), आळंदी ३०४ (३७), करंजवण (१३२५ (२४), ओझरखेड ४४९ (२१), दारणा १७६० (२४), मुकणे २२२१ (३०), वालदेवी ४८१ (४२), चणकापूर ७११ (२९), हरणबारी ४५५ (३९), गिरणा ५७९० (३१), पुनद ९९९ दशलक्ष घनफूट (७६ टक्के) असा जलसाठा आहे.

हेही वाचा : नाशिक: प्रचाराच्या धामधुमीत टंचाईचा प्रश्न ऐरणीवर, ६३९ गावे-वाड्यांना टँकरने पाणी

आठ धरणांमध्ये पाणी कमी

नागासाक्या धरण आधीपासून कोरडेठाक आहे. या पाठोपाठ पुणेगाव (०.८०), तिसगाव (पाच टक्के) धरणांची त्या दिशेने वाटचाल सुरू आहे. वाघाड (१९ टक्के), ओझरखेड (२१), भावली (१३), कडवा (२१), केळझर (१७), माणिकपूज (११) असा जलसाठा आहे. आठ धरणांमध्ये तुलनेत कमी जलसाठा आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nashik water crisis only 31 percent water remained in dams of nashik district css
Show comments