नाशिक: शासकीय यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमांची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावर नामांकन देत सर्वोत्कृष्ठ उपक्रमांना स्कॉच ग्रुप या संस्थेच्या वतीने पुरस्काराने गौरविण्यात येते. यंदा हा पुरस्कार नाशिक जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रभावी उपयोग करून पाणी टंचाई असणाऱ्या गावांमध्ये जमिनीतील पाणी पातळी वाढावी यासाठी मिशन भगिरथ प्रयास राबविण्यात आले. त्यानुसार बंधारे निर्मिती करण्यात येत आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी स्कॉच रेटिंग ग्रुप या संस्थेच्या वतीने जिल्हा परिषदेला राष्ट्रीय स्कॉच पुरस्कार जाहीर झाला. दिल्ली येथे स्कॉच ग्रुपचे अध्यक्ष समीर कोचर यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी पुरस्कार स्वीकारला.

हेही वाचा : कसारा घाटात थांबणाऱ्या वाहनांना आवर, अपघात रोखण्यासाठी ना वाहन तळ क्षेत्रात लोखंडी जाळ्या

Provocative slogans, Rashtriya Swayamsevak Sangh parade, RSS parade, Ratnagiri, RSS parade Ratnagiri,
रत्नागिरी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनप्रसंगी प्रक्षोभक घोषणा: चौघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Ratan Tata News
Ratan Tata : अशीही श्रद्धांजली! जो पुरस्कार प्रदान केला त्याला देण्यात आलं रतन टाटांचं नाव, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
nobel prize 2024
नोबेल पारितोषिक विजेत्यांची निवड कशी केली जाते? कोणत्या क्षेत्रांसाठी दिले जातात पुरस्कार?
Black Flags Shown to Uday Samant At Ratnagiri
Ratnagiri : रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राडा, उदय सामंतांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे
Nitin Gadkari, Arun Bongirwar Award,
गडकरी म्हणतात, “चुकून राजकारणात आलो, नाहीतर नक्षलवादी चळवळीत जाऊन…”
MPSC Agricultural Services, MPSC, court order,
‘एमपीएससी’ कृषी सेवा: न्यायालयाच्या आदेशानंतरही नियुक्ती देण्यास अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ?
cosmos bank get best cooperative bank award
कॉसमॉस बँकेला सर्वोत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार

फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रीय स्कॉच पुरस्काराचे ऑर्डर ऑफ मेरीट प्रमाणपत्र दुरदृश्यप्रणालीद्वारे स्कॉच ग्रुपचे रोहन कोचर यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी स्वीकारले होते. देशभरातून ३०० विविध प्रकल्पांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. ज्यामधील ७५ प्रकल्प ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कारासाठी पात्र झाले होते. विविध विषयातील तज्ज्ञांनी दिलेले गुण तसेच नागरिकांनी आभासी पद्धतीने केलेले मतदान यातून नाशिक जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेला मिशन भगिरथ प्रयास उपक्रम हा उत्कृष्ठ ठरला. मिशन भगिरथ प्रयास अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात २६१ साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या बाबतीत गावे स्वयंपूर्ण होण्यास मदत झाली आहे. पूर्णतः वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत साखळी बंधाऱ्यांबरोबरच वृक्षारोपण, जल पुनर्भरण, शोषखड्डे इत्यादी विविध पूरक उपक्रम केल्यामुळे जलस्त्रोत बळकटीकरणास मदत झाली आहे. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांसाठी राबवण्यात आलेल्या मिशन भगिरथ प्रयास उपक्रमाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आल्याने जिल्ह्याच्या दृष्टीने देखील ही अभिमानाची बाब आहे.