जिल्ह्याची बलस्थाने लक्षात घेता जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटीच्या (जेएनपीए ) वतीने निफाड तालुक्यात बहुप्रकल्पीय शुष्क बंदर सुरू करण्यात येणार आहे. शासनाने यासाठी २५० कोटी गुंतविले असून या अनुषंगाने पायाभूत सोयी सुविधा देण्यात येत आहे. विशेष आर्थिक क्षेत्र (सेज) अनुषंगाने सर्व विभाग या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आले असल्याची माहिती जेएनपीएचे अध्यक्ष संजय सेठी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हेही वाचा >>>नाशिक स्मार्ट सिटी अंतर्गत सात हजार पाणी मीटर बसविण्याची योजना

Rajewadi Station , Purandar Airport ,
पुणे : राजेवाडी स्थानकापासून पुरंदर विमानतळापर्यंत रेल्वे मार्गिका, एकात्मिक वाहतूक आराखड्यात प्रकल्प प्रस्तावित
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
pune district planning committee loksatta news
पुणे : वर्षात अडीच हजार कोटींची कामे, जिल्ह्यासाठी तेराशे कोटींसह ७५३ कोटींच्या अतिरिक्त निधीला ‘डीपीसी’मध्ये मंजुरी
Pune Municipal Corporation , Tax , Elections ,
पुणेकर झाले खूश, यंदा करवाढ नाही!
pradhan mantri awas yojana, funds , private developers ,
पंतप्रधान आवास योजनेतील खासगी विकासकांना ५० कोटींचा जादा निधी! केंद्रीय गृहनिर्माण विभागाकडून अखेर विचारणा!
State government approves subsidy of Rs 165 crore for orange producers
संत्री उत्पादकांसाठी १६५ कोटींचे अनुदान, राज्यशासनाची मंजुरी
minister madhuri misal instructed pune municipal corporation
दंडमाफीचा प्रस्ताव द्या, नगरविकास राज्यमंत्र्यांनी महापालिकेला काय केल्या सूचना ?
Regional Transport Department Officer Hemangini Patil claims about the reduction in accidents thane news
उपाययोजनांमुळे डिसेंबर महिन्यात अपघातामध्ये घट; प्रादेशिक परिवहन विभाग अधिकारी हेमांगिनी पाटील

शुष्क बंदर होण्यासाठी निफाडसह नाशिक तालुक्यातील राजकीय मंडळी प्रयत्नशील होती. अखेर निफाड तालुक्यातच हे बंदर होणार असल्याचे निश्चित झाले आहे. शुक्रवारी येथे गुंतवणूकदार परिषद झाली. तत्पूर्वी सेठी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेठी यांनी नाशिकचे व्यावसायिक आणि औद्योगिक मूल्य लक्षात घेता या ठिकाणी बहुप्रकल्पीय शुष्क बंदर सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. सेज आणि बंदरचे काम सारखे आहे. या अनुषंगाने व्यावसायिक, उद्योजकांना आयात-निर्यातीसाठी आवश्यक शासकीय परवानग्या मिळवून देण्यासाठी काम करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>>धुळे : बहिणीची बदनामी केल्याने युवकाचा खून; मोहाडीतील खूनाचा १२ तासात उलगडा

यामुळे पैसे आणि वेळ वाचणार आहे. राज्यात सांगली, वर्धा, जालना आणि नाशिक येथे शुष्क बंदर करण्यात येणार आहे. वर्धा आणि जालना परिसरात बंदराचे काम अंतिम टप्प्यात असून नाशिकमध्येही लवकरच कामास सुरूवात होईल. यामुळे उद्योग, व्यवसाय यातील अस्थिरता थांबेल, त्यातील धोक्याची तीव्रता कमी होईल. आयात- निर्यातीसाठी मालाची देवाण घेवाण सुलभ होईल. यामुळे नाशिकच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. जागतिक स्तरावर स्पर्धेत टिकण्यासाठी हा प्रयत्न आहे. निफाड येथे या बंदरासाठी शासनाकडून टप्प्याटप्प्यात गुंतवणूक करण्यात येणार आहे. बंदर सक्षमपणे कार्यान्वित होण्यासाठी रस्ता प्राधिकरण तसेच रेल्वेशी चर्चा सुरू आहे. समृध्दी महामार्गचा फायदा सर्व प्रकल्पांना होणार आहे. या सर्व सेवेचा लाभ उद्योजकांनी घ्यावा, असे आवाहन सेठी यांनी केले आहे.

Story img Loader