नाशिक – ज्या शिडीने वर गेले, ती शिडी सोडायला भाजप तयार झाला असून त्यांना आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नकोसा झाला आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक लोकसभा मतदार संघात वंचितचे उमेदवार करण गायकर यांच्या प्रचारार्थ आलेले आंबेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संघासंदर्भात केलेल्या विधानावर आंबेडकर यांनी भाष्य केले. सुरुवातीच्या काळात आम्हांला संघाची गरज होती. आता भाजप सक्षम झाला असून स्वत:चा कार्यभार पक्ष स्वत: सांभाळत आहे, असे विधान नड्डा यांनी केले आहे. या विधानावर ही चांगली गोष्ट असल्याचा टोला आंबेडकर यांनी हाणला. मध्यंतरी आपण सरसंघचालक मोहन भागवत यांना दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी तुम्हाला भेटले का, तुम्ही भेटायची वेळ मागितली, तेव्हा त्यांनी ती दिली होती का, असे प्रश्न विचारले होते. परंतु, त्याचे उत्तर काही मिळाले नाहीस, असे त्यांनी सूचित केले.

guardian minister post Raigad District BJP shiv sena NCP Eknath Shinde Aditi Tatkare Bharat Gogawle
रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असताना भाजपची नवी खेळी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Delhi election result updates in marathi
‘आप’ची मतपेढी फुटण्यावरच दिल्लीतील निकालाचे गणित?
Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
Black market for tickets started three days before cricket match
क्रिकेट सामन्याच्या तीन दिवसांपूर्वीपासूनच तिकिटांचा काळाबाजार…
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
pressure politics Ajit Pawar backing Dhananjay Munde NCP Beed walmik karad
अजित पवार हे धनंजय मुंडे यांना पाठिशी का घालत आहेत ?
archana patil chakurkar marathi news
अर्चना चाकुरकरांच्या प्रश्नामुळे भाजपमधील जुन्या – नव्याचा वाद पुन्हा चव्हाट्यावर

हेही वाचा >>>नाशिक मनपातील कथित भूसंपादन घोटाळा ऐरणीवर; महायुती-मविआचे आरोप-प्रत्यारोप

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या शिवसेनेचे राज ठाकरे हे प्रमुख झाल्यास आश्चर्य वाटायला नको. नरेंद्र मोदी आणि भाजपने ठाकरे बंधूंमध्ये इमानदारीची स्पर्धा लावली आहे. मोदी एकिकडे उद्धव ठाकरेंना गरज पडल्यास सर्वतोपरी मदत करणार असे सांगतात. दुसरीकडे राज ठाकरे यांना प्रचारात सहभागी होण्यास भाग पाडतात. या दोन्ही भावांमध्ये आपल्याशी आणि भाजपशी अधिक कोण एकनिष्ठ, हे जोखले जात आहे. लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही ठाकरे बंधू भाजपबरोबर असतील, असा दावा आंबेडकर यांनी केला. मध्यंतरी मुस्लिम समाजातील बुध्दिजिवींनी ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीनंतर तुम्ही भाजपबरोबर समझोता करणार की नाही, असा प्रश्न विचारला होता. परंतु, ठाकरेंनी त्याचे उत्तर न देता मोदींवर टीका केली. हा सर्व केवळ देखावा असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

Story img Loader