धुळे: जिल्ह्यातील पाच गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असून सात संशयितांविरुध्दही हद्दपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सण आणि उत्सवाच्या काळात विघ्न येऊ नये,यासाठी जिल्हा पोलीस प्रशासन सतर्क आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सव, ईदच्या काळात नागरिकांनी सामाजिक सलोखा राखावा, एकोप्याने येणारे सर्व सण आणि उत्सव साजरे करून जिल्ह्याची शांतता आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिनव गोयल आणि पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले आहे.

pm modi to inaugurate 1st underground metro
पंतप्रधानांच्या हस्ते प्रकल्पांचे लोकार्पण; मुंबईकरांच्या सेवेत पहिली भुयारी मेट्रो, मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
karnataka cm siddaramaiah
‘मुदा’ घोटाळाप्रकरणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न; तक्रारदाराचा आरोप, ईडीकडे कारवाईची मागणी
Government discloses data on missing women in nagpur
धक्कादायक… ८ महिन्यांत नागपुरातून १३०० हून अधिक महिला बेपत्ता; प्रेमप्रकरण, अनैतिक संबंधांतून पलायन…
Navi Mumbai, Uran, Panvel constructions
प्रकल्पस्तांच्या मतांसाठी महायुतीची अखेरची धडपड, गरजेपोटी बांधकामे नियमित करण्याचा अखेर निर्णय
The state government plans to start work on ambitious projects in the state before the implementation of the code of conduct for assembly elections
४५ हजार कोटींच्या प्रकल्पांना गती; आचारसंहितेपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
Why announcement of houses due to need only in elections Question by project victims
गरजेपोटी घरांची घोषणा निवडणुकांमध्येच का? प्रकल्पग्रस्तांचा सवाल

हेही वाचा… विश्वकर्मा योजनेसाठी प्रभावी अमलबजावणी आवश्यक, डॉ. भारती पवार यांचे प्रतिपादन

आगामी सण आणि उत्सवाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाची शांतता समितीची बैठकही झाली. यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी असल्याने त्यांच्या मिरवणुकीचे नियोजन प्रशासनाने केले आहे. एक दिवसाआड या मिरवणुका निघतील. या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची देखील दक्षता बाळगली जाणार आहे. समाजाला बाधा ठरतील अशा समाजकंटकांविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाई आणि हद्दपारीचे आदेश अधीक्षक बारकुंड यांनी दिले आहेत. १२ जणांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार आहे. २०९ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.