नंदुरबार : आदिवासींचे जल, जंगल, जमीन या संदर्भातील सर्व दावे निकाली काढण्यात येतील, फेटाळलेल्या दाव्यांची फेरतपासणी करण्यात येईल, वन संवर्धन आणि भूसंपादन कायदे अधिक मजबूत केले जातील तसेच देशातील ज्या भागात आदिवासींची लोकसंख्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असेल तो भाग घटनेच्या सहाव्या परिशिष्टात समावेश करण्यात येईल आदी आश्वासने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मंगळवारी दिली. भारत जोडो न्याययात्रेनिमित्त दाखल झालेल्या राहुल यांचे येथे जोरदार स्वागत करण्यात आलेे.

हेही वाचा >>> कोविड-१९’ महासाथीत आयुर्मानात दीड वर्षांनी घट

Loksatta Varshavedh special issue issue released by chief minister devendra fadnavis
मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन सोहळ्याला रंगत; ‘लोकसत्ता वर्षवेध’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Rahul Gandhi on Maharashtra election result
राज्याच्या निकालाचे संसदेत पडसाद; निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवर राहुल गांधींकडून शंका
controversy over dhirendra shastri moksha remark
उलटा चष्मा:मोक्ष मिळवून दिला जाईल!
Suhas Hiremath , Karad, India culture,
दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Shivendra Singh Raje, Guardian Minister ,
पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या स्वागताला ‘उदयनराजे मित्र समूह’
Loksatta chawadi Ahilyanagar uday samant State Environment Minister Shambhuraj Desai Satara
चावडी: योग्य वेळी योग्य भूमिका

भारत जोडो न्याय यात्रेने मंगळवारी महाराष्ट्रात प्रवेश केला. यानिमित्त नंदुरबार येथील सीबी मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी यांनी, जय आदिवासी नारा देत आदिवासी बांधवांच्या प्रश्नाशी निगडीत मुद्यांना हात घालताना केंद्रातील भाजप सरकारने आदिवासींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला, आदिवासींसाठी तयार केलेल्या जाहीरनाम्यातील विषय मांडत त्यांना पुन्हा काँग्रेसकडे खेचण्याचा प्रयत्न केला. आदिवासी या देशाचे मूळ मालक असून आदिवासी शब्दाशी जल, जंगल, जमिनीचा अधिकार जोडला जातो, परंतुवनवासी शब्दाबरोबर जोडला जात नसल्याने भाजप आदिवासींना वनवासी म्हणत असल्याचा आरोप गांधी यांनी केला.

Story img Loader