लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: रविवारी मोसम पूल येथील चौकात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अलोक जयस्वाल (१२) या शाळकरी मुलाचे रुग्णालयात निधन झाले. शहरात सध्या सुरू असलेल्या मोसम पूल आणि अन्य रस्ते कामांप्रसंगी वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यानेच या विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा आरोप करीत विविध संघटनांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले. या प्रसंगी नाकर्तेपणाचा ठपका ठेवत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला.

Tribal Reservation Rights Action Committee warns the state government
धनगरांना आरक्षण दिले तर ८५ मतदार संघात भूमिका घेऊ, आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीचा राज्य सरकारला इशारा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
SRA project to be done along Mumbai-Bangalore highway
पुणे: मुंबई- बंगळुरु महामार्गालगत होणार एसआरए प्रकल्प; प्रकल्प रद्द होण्याकरिता ‘त्या’ व्यक्तीने घेतल्या मृत व्यक्तींच्या सह्या?
Petitioners against reservation of Maratha society claim in High Court Mumbai news news
मराठा समाजाचे मागासलेपण स्वयंघोषित; आरक्षणविरोधी याचिकाकर्त्यांचा उच्च न्यायालयात दावा
Ladki Bahin Yojna
लाडकी बहीण योजना अन् महिलांच्या खात्यात दीड हजार रुपये; सरकारच्या योजनेतून मतांची पेरणी?
Why change in sugar control order is needed after 58 years
साखर नियंत्रण आदेशात ५८ वर्षांनी बदलाची गरज का? नवीन तरतुदी काय आहेत?
Pointing out lack of coordination in development system Nitin Gadkari reprimanded officials
विकास यंत्रणातील असमन्वयाकडे लक्ष वेधत गडकरी यांनी टोचले अधिकाऱ्यांचे कान
Navi Mumbai schools CCTV, Sakhi Savitri Committee,
नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष

रविवारी दुपारी अलोक हा काका पिंटू यादव यांच्यासह दुचाकीने शहराच्या संगमेश्वरातील दवाखान्यात उपचारासाठी जात होता. सोबत अलोकची आईही होती. तिघे मोसम पूल चौकातून दुचाकीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या टँकरची धडक बसली. त्यात अलोक आणि त्याची आई दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी अलोकचे निधन झाले.

हेही वाचा… नाशिक : फवारणी औषधामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

शहरात महापालिकतर्फे ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच नवीन बस स्थानकाकडे जाणारा मोसम नदीवरील एक जूना पूल पाडून तेथे पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामांमुळे शहरात जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांच्या निमित्ताने महापालिका, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करणे आवश्यक होते, त्यासाठी अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंदी करावयास हवी होती. मात्र तसे न झाल्याने शहरातून वाहने चालविताना दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेकदा महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात, अशी तक्रार आंदोलकांनी केली.