लोकसत्ता वार्ताहर

मालेगाव: रविवारी मोसम पूल येथील चौकात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या अलोक जयस्वाल (१२) या शाळकरी मुलाचे रुग्णालयात निधन झाले. शहरात सध्या सुरू असलेल्या मोसम पूल आणि अन्य रस्ते कामांप्रसंगी वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यानेच या विद्यार्थ्याचा बळी गेल्याचा आरोप करीत विविध संघटनांनी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन केले. या प्रसंगी नाकर्तेपणाचा ठपका ठेवत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदविला.

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Delhi Assembly election 2025 Yamuna pollution issue in campaign in Delhi
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोपांची राळ; दिल्लीत यमुनेच्या प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी
Chemicals are now used to eliminate mosquitoes in vasai
वसई : डास निर्मूलनासाठी आता रसायनाचा वापर, डासांचा प्रभाव असलेली ९९ ठिकाणी निश्चित
Yogi Adityanath First Reaction
Stampede in Kumbh Mela : योगी आदित्यनाथ यांना अश्रू अनावर; म्हणाले,”चेंगराचेंगरीत ३० भाविकांचा बळी जाणं…”
Flocks of devotees gathered at the Maha Kumbh mela in Prayagraj, Uttar Pradesh on January 29
Mahakumbh 2025 Stampede : ३० लोकांचा बळी कसा गेला? DIG म्हणाले, “भाविक ब्रम्ह मुहूर्ताची वाट पाहात होते, तेवढ्यात…”
stampede at Sangam ghat on Mauni Amavasya in Prayagraj on Wednesday Maha kumbh Yogi Adityanath
Stampede Breaks Out at Maha Kumbh : महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, तीस भाविकांचा मृत्यू
Sanjay Rathod , suicide case girl,
तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना दिलासा, फौजदारी कारवाईची मागणी करणारी याचिका निकाली

रविवारी दुपारी अलोक हा काका पिंटू यादव यांच्यासह दुचाकीने शहराच्या संगमेश्वरातील दवाखान्यात उपचारासाठी जात होता. सोबत अलोकची आईही होती. तिघे मोसम पूल चौकातून दुचाकीने जात असताना पाठीमागून येणाऱ्या टँकरची धडक बसली. त्यात अलोक आणि त्याची आई दोघे गंभीर जखमी झाले. दोघांना नाशिक येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी अलोकचे निधन झाले.

हेही वाचा… नाशिक : फवारणी औषधामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

शहरात महापालिकतर्फे ठिकठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. तसेच नवीन बस स्थानकाकडे जाणारा मोसम नदीवरील एक जूना पूल पाडून तेथे पुलाचे काम सुरु करण्यात आले आहे. या कामांमुळे शहरात जागोजागी वाहतुकीची कोंडी होत आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर सुरू असलेल्या कामांच्या निमित्ताने महापालिका, पोलीस आणि प्रादेशिक परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे योग्य नियोजन करणे आवश्यक होते, त्यासाठी अवजड वाहनांना शहरातून प्रवेश बंदी करावयास हवी होती. मात्र तसे न झाल्याने शहरातून वाहने चालविताना दुचाकीस्वारांना तसेच पादचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. याशिवाय अनेकदा महत्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलीस नसतात, अशी तक्रार आंदोलकांनी केली.

Story img Loader