लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: कापसाला प्रतिक्विंटल १३ हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा, यासह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांसाठी भडगाव येथे पाचोरा चौफुलीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.

sharad pawar
शरद पवारांचे एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र; सरकारला इशारा देत म्हणाले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
15 days deadline for installation of CCTV in Government Ashram Schools of Tribal Development Department nashik
आश्रमशाळांना सीसीटीव्हीसाठी १५ दिवसांची मुदत; आदिवासी विकास विभागाचा निर्णय
Executive Director of Konkan Irrigation Development Corporation approved two year plan to supply 500 million liters of daily water
भिरा’च्या पाणी प्रस्तावाला गती,शासन मंजुरीनंतर पनवेल महापालिकेचा ३४०० कोटींचा खर्च
Nashik compensation land, Farmers Action Committee Nashik,
नाशिक : जागेचा मोबदला न मिळाल्यास रस्त्यांवर नांगर – मनपा आयुक्तांना शेतकरी कृती समितीचा इशारा
job orders till 15th september under pesa act agitationsuspended after assurance
पेसा कायद्यांतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत नोकरीचे आदेश – आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित
Adivasis march to Vikas Bhavan for Pesa recruitment nashik news
पेसा भरतीसाठी आदिवासींचा विकास भवनावर मोर्चा; सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींचा सहभाग
JP Gavit, pesa recruitment, Nashik, JP Gavit agitation
नाशिक : पेसा भरतीसाठी आंदोलन तीव्र करणार – जे. पी. गावित यांचा इशारा

महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे आणि तालुकाध्यक्ष अभिमान हाटकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तालुकाध्यक्ष हाटकर यांनी शेतकर्यांच्या घरात अजूनही कापूस पडून असल्याचे सांगितले. कापूस खरेदीसाठी व्यापारी येत नाहीत. व्यापारी आला तर कापसाला समाधानकारक भाव देत नाही. यामुळे शेतकरी त्रस्त असताना उधारी मागणारे चकरावर चकरा मारत आहेत. या सर्व परिस्थितीत शेतकरी हतबल झाला असल्याचे सांगितले.

आणखी वाचा- आश्रमशाळांतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी करिअर प्रबोधिनी, डॉ. विजयकुमार गावित यांचा मानस 

यावेळी निवासी नायब तहसीलदार रमेश देवकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन संघटनेच्या मागण्यांचे निवेदन वरिष्ठांकडे पोहचविण्यात येईल, असे आश्वासन दिले. आंदोलनात संघटनेचे भगवान चौधरी, शांताराम आचारी. देविदास पाटील, विलास देशमुख, मनोज परदेशी यांच्यासह तालुक्यातील शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते.