आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांना शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुढील शैक्षणिक वर्षात शालेय प्रवेशासाठी बुधवारी सकाळी पुण्यातील महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद येथे आभासी पध्दतीने सोडत काढण्यात आली असली तरी त्यासंदर्भातील माहिती पालकांपर्यंत पोहचण्यासाठी दोन दिवसाचा कालावधी लागणार आहे.

हेही वाचा >>> जळगाव जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांसाठी २३७४ इच्छुकांचे अर्ज – दोन्ही मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 

प्रवेशाची पायरी : ‘आयआयटी’मध्ये ‘डिझाइन’ पदवी सीईटी
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
sarthi foreign scholarship
‘सारथी’च्या परदेशी शिक्षण शिष्यवृत्तीची निवडयादी कधी जाहीर होणार?
Nagpur High Court , academic loss, student,
विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी न्यायालयाने नियमांपलिकडे…
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
centers of Excellence will be established in the state to improve the quality of health care Mumbai news
आरोग्य सेवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी राज्यात उत्कृष्टता केंद्रे स्थापन करणार
in survey found 522 out of school children conducted by Municipal Corporation and NGOs
पिंपरी : उद्योगनगरीतील ५२२ मुलांनी चढली नाही शाळेची पायरी; सर्वेक्षणातून धक्कादायक माहिती
no decision from maha government on mahajyoti withdraw from uniform policy process
‘समान धोरण’मुळे लाखो विद्यार्थी वंचित; ‘महाज्योती’ बाहेर पडल्यानंतर सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा

यंदा नाशिक जिल्ह्यातील ४०१ शाळा या प्रक्रियेत सहभागी झाल्या असून पाच हजाराहून अधिक जागा विद्यार्थ्यांसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातून १६ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले आहेत. पहिल्या सोडतीत आपल्या पाल्याचा नंबर लागतो की नाही, याविषयी पालकांना उत्सुकता असतांना प्रवेशासाठी मोठ्या प्रमाणावर अर्ज आल्याने अनेकांना प्रवेशापासून मुकावे लागेल असे चित्र आहे. बुधवारी आभासी पध्दतीने पुणे येथे सोडत काढण्यात आली. मात्र राज्यस्तरावरून एकाच वेळी ही सोडत जाहीर होत असल्याने काही तांत्रिक बाबींची पूर्तता होत असल्याने पालकाना पोर्टलवर याची माहिती मिळाली नाही. यामुळे पालकांमध्ये दिवसभर चलबिचल राहिली.

हेही वाचा >>> उपाययोजना न करता अवजड वाहतूक बंद करण्यास विरोध ; आंदोलनाचा वाहतूकदार संघटनेचा इशारा

याबाबत काहींनी शिक्षण विभागाकडे दुरध्वनीवरून संपर्क केला. काही जणांनी प्रत्यक्ष कार्यालयात जावून आपल्या पाल्याचा क्रमांक लागला की नाही, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.वास्तविक आभासी पध्दतीने राज्यस्तरावर सोडत जाहीर होत असतांना पोर्टलवर जिल्हानिहाय ही माहिती संकलन, यादी अद्यावत होण्याचे काम सुरू राहते. यामुळे पालकांपर्यंत या याद्या दोन दिवसांनी पोहचतात. बुधवारी यादी जाहीर असल्याचे समजताच पालकांनी सकाळ पासून सायबर कॅफे, भ्रमणध्वनीवर आपल्या पाल्याचा क्रमांक लागला की नाही हे पाहण्यास सुरुवात केली होती. अपेक्षित माहिती समोर येत नसल्याने अनेकांमध्ये अस्वस्थता पसरली. दोन दिवसांनी प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी तसेच प्रवेशाविषयी वेळापत्रक जाहीर होणार आहे. पालकांनी भ्रमणध्वनीवरील लघु संदेशावर अवलंबून न राहता पोर्टलवर याविषयी माहिती घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.