जळगाव : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानावर हल्ला करण्याचे काम मोदी सरकार करत असून नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नसताना ते मला प्रश्न विचारत आहेत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी मोदींना लक्ष्य केले. देशातील जनताच त्यांची हुकूमशाही मोडून काढणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

हेही वाचा >>> आंध्रच्या मुख्यमंत्र्यांविरोधात घरातूनच संघर्ष

Rahul Gandhi Lok Sabha speech update
राहुल गांधी यांची फटकेबाजी; लोकसभेत विविध मुद्द्यांवरून सरकारवर टीका; सत्ताधारी खासदार संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
minister uday samant on Marathi language,
मराठीचा अनादर करणाऱ्यांची दादागिरी ठेचून काढू; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचा इशारा
Image Of Sonia Gandhi And Draupadi Murmu
Sonia Gandhi : राष्ट्रपतींविरोधातील टीका भोवणार? सोनिया गांधी यांच्याविरोधात तक्रार, गुन्हा नोंदवण्याची मागणी
Suhas Hiremath , Karad, India culture,
दातृत्व अन् त्यागाची भारत देशाची संस्कृती, सुहास हिरेमठ यांचे गौरवोद्गार
Slogans raised against Kirit Somaiya Malegaon fake certificates Rohingya Bangladeshi infiltrators residents
मालेगावात किरीट सोमय्यांविरोधात घोषणाबाजी, बनावट जन्म प्रमाणपत्र मिळवणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा
Prithviraj Patil asserted that protection of democracy and freedom is a salute to Gandhiji
लोकशाही रक्षण हेच गांधीजींना अभिवादन- पृथ्वीराज पाटील
Ramdas Athawale appeal Sharad Pawar NDA
शरद पवार यांनी एनडीएमध्ये यावे – रामदास आठवले यांचे आवाहन

जामनेर येथे रविवारी दुपारी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कारभारावर टीका केली. जळगाव जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत एकही नवीन उद्योग आला नाही. खान्देशसह जिल्ह्यात वस्त्रोद्योग उद्यान झाले नाही. केळी उत्पादकांना पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. केळीचे अनुदानही मिळाले नसल्याकडे पवार यांनी लक्ष वेधले. उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांची फसवणूक केली. गॅस सिलिंडरचे दर गगनाला भिडले आहेत. राहुल गांधी यांच्या पाठीशी देशातील युवक उभे राहत आहेत,  असेही पवार यांनी नमूद केले.

खडसेंचा नाइलाज 

एखाद्या व्यक्तीवर वैयक्तिक टीका करण्याची भूमिका महाराष्ट्रात यापूर्वी नव्हती. आता ती सुरू झाली आहे. त्यातून अनेकांना यातना सहन कराव्या लागत आहेत. ही परिस्थिती  एकनाथ खडसेंवर आली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातून त्यांना काही निर्णय घ्यावा लागला.

Story img Loader