लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : शाळाबाह्य अनियमित आणि स्थलांतरीत बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करून त्यांचे शिक्षण अबाधित राखण्यासाठी पाच ते २० जुलै या कालावधीत जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी दिली.

maharashtra mid day meal marathi news
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांची खिचडीपासून सुटका; पोषण आहारातील आता १५ पाककृती कोणत्या?
recruitment of Part Time Directors, Higher Primary Schools, recruitment of Part Time Directors in schools, Maharashtra,
राज्यातील उच्च प्राथमिक शाळांमध्ये अंशकालीन निदेशकांची भरती?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
pankaja munde manoj jarange
पंकजा मुंडेंच्या विधान परिषदेच्या उमेदवारीला मनोज जरांगेंचा विरोध? सूचक वक्तव्य करत म्हणाले…
Maharashtra state, Schools to Have 124 Holidays, Schools to Have 124 Holidays in 2024 2025 education year, 12 Days for Diwali holiday, holidays, teachers, students, schools news
नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना कुठल्या सुट्ट्या राहणार माहिती आहे का? आताच बघा व सुट्ट्यांचे नियोजन करा
India Into the Finals of T20 World Cup Finals
IND vs ENG: दणदणीत विजयासह टीम इंडिया फायनलमध्ये; अक्षर-कुलदीपच्या फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण
nashik bribe marathi news
नाशिक जिल्ह्यात एकाच दिवशी तीन लाचखोरांवर कारवाई, एक लाखाची लाच स्वीकारताना महावितरणचा अभियंता जाळ्यात
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”

बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम अंतर्गत राज्यात सहा ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास शाळेच्या पटावर नोंदविले जाणे, बालकांनी शाळेत नियमित येणे आणि त्याला दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी काम करण्यात येत आहे. जिल्ह्यात रोजगारानिमित्त मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असते. स्थलांतराचा कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल असा आहे. ऊसतोडणी, वीटभट्टी, दगड खाण, कोळसा खाण, शेतमजुरी, बांधकाम व्यवसाय, सार्वजनिक बांधकाम विभाग अशा ठिकाणी ही मंडळी कामासाठी जातात. कुटूंबाबरोबर मुलेही स्थलांतरीत होत असल्याने सहा महिन्यांहून अधिक दिवस बालके शिक्षणापासून वंचित राहतात. स्थलांतरामुळे शाळा बाह्य होणाऱ्या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शिक्षण विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. मोहिमेत शिक्षण विभागासह अन्य आस्थापनाही सहभागी होणार आहेत.

आणखी वाचा-खंडणीसाठी वारकऱ्यास धमकी देणे निंदनीय, संत निवृत्तीनाथ संस्थानकडून निषेध

या मोहिमेतंर्गत होणारे सर्व्हेक्षण गावात, शहरात, गजबजलेल्या वस्त्या, रेल्वे स्थानक, बस स्थानक, बाजार, झोपडपट्टी, गावाबाहेरील पाल आदी ठिकाणी होणार आहे. यासाठी कामगार अधिकारी, जिल्हाधिकारी, बाल अधिकारी, शिक्षण अधिकारी, समाज कल्याण अधिकारी आदींची समिती गठीत करण्यात आली आहे. मोहीम राबवितांना तीन ते सहा वयोगटाचे सर्व्हेक्षणाची जबाबदारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास, बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्या समितीवर तर, सहा ते १४ वयोगटाची जबाबदारी शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि १४ ते १८ वयोगटातील बालकांचा शोध घेण्याची जबाबदारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यावर राहणार आहे.