लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: मध्य रेल्वे प्रशासनातर्फे रेल्वे स्थानक आणि परिसराच्या विकासासह प्रवाशांचा रेल्वे प्रवास अधिक जलद व सुखकर आणि सोयीचा व्हावा, या दृष्टीने विविध विकास कामे सुरू आहेत. या अंतर्गत भुसावळ ते मनमाड या अहोरात्र व्यस्त असलेल्या मार्गावर भुसावळ- मनमाड दरम्यान तिसरा रेल्वे मार्ग टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. याअंतर्गत नांदगाव ते मनमाड दरम्यान २५.०९ किलोमीटरचे काम यावर्षी सुरु होण्याची शक्यता आहे.

Considering rush of passengers during festive season Railways decided to start new trains in nagpur ppd
आनंदवार्ता! ‘या’मार्गावर नवीन रेल्वे धावणार; मध्य रेल्वे मार्गावरील प्रवाशांना…
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
Traffic congestion on Eastern Expressway resolved with flyovers opening at Chhedanagar Junction
छेडानगर जंक्शन अखेर वाहतूक कोंडीमुक्त
Mumbai Western Railway, new local train timetable
मुंबई : १५ डबा लोकलच्या २०९ फेऱ्या, पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकात आजपासून बदल
railway gate of mothagaon village, Dombivli,
डोंबिवलीतील मोठागाव रेल्वे फाटकावरील पुलाच्या पोहच रस्त्याने बाधितांच्या पुनर्वसनासाठी ८४ कोटींचा प्रस्ताव
Konkan Railway, Konkani passengers, Konkan,
कोकणी प्रवासी कायम दुर्लक्षित
Mumbai, Speed ​​limit,
मुंबई : राम मंदिर – गोरेगाव – मालाड विभागात वेगमर्यादा
Nagpur railway station trains cancelled
नागपूर : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे! ‘या’ ६१ रेल्वे रद्द…

भुसावळ ते पाचोरा ७१.७२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. भुसावळ- मनमाड तिसरा लोहमार्ग एकूण १८३.८४ किलोमीटर अंतराचा आहे. यावर १३६०.१६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. भुसावळ ते पाचोरा या विभागाची कामे पूर्ण झाली आहेत. चाळीसगाव ते पिंपरखेड ३१.१९ किलोमीटर आणि नांदगाव ते मनमाड २५.९ किलोमीटरचे काम आता सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या पाचोरा ते चाळीसगाव ४४.९४ किलोमीटर आणि पिंपरखेड ते नांदगाव १०.४० किलोमीटरचे काम सुरू आहे.

आणखी वाचा-Nashik Bus Accident : सप्तश्रृंगी गडावर बस दरीत कोसळली, एकाचा मृत्यू, १५ प्रवासी जखमी, मदत कार्य सुरू

या पार्श्वभूमीवर, भुसावळ ते मनमाड तिसर्या लोहमार्गाच्या अस्तरीकरणाचे काम पूर्ण होण्याचे संकेत रेल्वे प्रशासनाने दिले आहेत. प्रामुख्याने उत्तर भारतातून आणि राज्याच्या विविध भागातून भुसावळ- मनमाडमार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्यांची संख्या जास्त आहे. हा मार्ग अहोरात्र व्यस्त असतो. भुसावळ- मनमाड तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई ते हावडा या व्यस्त मार्गावरील मनमाड -भुसावळ विभागातील रेल्वे गाड्यांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे रेल्वेचा वेग वाढण्यासही मदत होईल, शिवाय प्रवासी गाड्याबरोबरच मालवाहतूक गाड्या देखील मोठ्या प्रमाणावर या मार्गाने धावतील. त्यामुळे रेल्वेला मोठा महसूल यातून मिळण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सध्या या कामाला वेग देण्यात आलेला आहे. मनमाड -दौंड दुहेरी मार्गाचे कामही युद्ध पातळीवर सुरू आहे.