नाशिक – मणिपूरमधील हिंसाचाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीसह आदिवासी संघटनांच्या वतीने शनिवारी बागलाण (सटाणा) तहसील कार्यालयावर काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चाला काही जणांकडून करण्यात आलेल्या दगडफेकीमुळे गालबोट लागले. दगडफेकीत २० पेक्षा अधिक वाहनांच्या काचा फुटल्या. या प्रकरणी पोलिसांनी ३० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा >>> नाशिक: सर्पदंशामुळे बालकाचा मृत्यू

Mumbai crime news, Youth Murder Ghatkopar,
मुंबई : घाटकोपरमध्ये तरुणाची हत्या
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
Manipur Curfew
Curfew  in Manipur : आता घराबाहेर पडण्यासही मनाई; मणिपूरमध्ये नेमकी परिस्थिती काय?
badlapur school girl rape case marathi news
बदलापूर: ‘त्या’ माध्यम प्रतिनिधीला जामीन मंजूर, वकील संघटनांचा पुढाकार, अन्य आरोपींनाही जामीन
3 people suffered with severe eye damage due to lasers light in kolhapur
कोल्हापुरात लेझरमुळे तिघांच्या डोळ्यांना गंभीर इजा; नेत्रविकार तज्ज्ञांकडून बंदी घालण्याची माग
brick kiln woman worker gang rape near titwala
टिटवाळ्याजवळ वीटभट्टी मजूर महिलेवर सामूहिक लैंगिक अत्याचार   
Ban on use of DJs and laser lights in Eid processions
‘ईदच्या मिरवणुकीत डीजे, लेझर दिव्यांच्या वापरावर बंदी आणा’
Four police suspended, Khar, detaining person Khar,
खारमध्ये एका व्यक्तीला बेकायदेशिररित्या ताब्यात घेतल्याप्रकरणी चार पोलीस निलंबित

मणिपूर येथील हिंसाचारात आदिवासी महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन, मोर्चे काढण्यात येत आहेत. मणिपूरसह देशभरात आदिवासी, दलित, बौद्ध, अल्पसंख्यांकावर वाढलेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमिवर बागलाण तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी तसेच विविध आदिवासी संघटना, पुरोगामी समविचारी पक्ष संघटनांच्या वतीने शनिवारी दुपारी बागलाण तहसील कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरपासून मोर्चाला सुरुवात झाली.

हेही वाचा >>> मालेगावात चोऱ्यांमध्ये वाढ; कारवाईची आम्ही मालेगावकर संघटनेची मागणी

मोर्चात हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. मोर्चा शांततेत तहसील कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. सभेनंतर मोर्चेकरी परतत असताना पाटील चौकातत अचानक काही जणांनी ठिय्या दिल्याने गोंधळ उडाला. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून त्यांना पांगविण्याचा प्रयत्न केला असता टोळक्याने वाहनांवर दगडफेक केली. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तत्काळ धरपकड सत्र सुरू करुन ३० पेक्षा अधिक जणांना ताब्यात घेतले आहे.