नाशिक : देवळाली कॅम्प भागातील बार्न्स स्कूल आणि महाविद्यालयात जलतरण स्पर्धेवेळी शार्दुल पोळ या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. मूळचा पुण्यातील विश्रामवाडीचा असणारा शार्दुल या महाविद्यालयात इयत्ता बारावीत शिक्षण घेत होता. देवळाली कॅम्प भागातील नामांकित बार्न्स स्कूल व महाविद्यालयाच्या वसतिगृहात शार्दुल वास्तव्यास होता. महाविद्यालयात मंगळवारी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

पहिल्या सत्रात काही विद्यार्थ्यांच्या स्पर्धा झाल्यानंतर दुपारी जेवणाची सुट्टी झाली. त्यानंतर पुन्हा स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी शार्दुलने पाण्यात उडी मारली. काही वेळ होऊनही तो पुन्हा वर आला नाही. हे लक्षात येताच त्या ठिकाणी तैनात असलेल्या कर्मचाऱ्याने तलावात उडी मारून शार्दुलला बाहेर काढले. त्याच्या नाकातोंडातून शरीरात पाणी गेल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली होती.

Who is Akshay Shinde
Who is Akshay Shinde : चिमुकलींवर अत्याचार करणारा अक्षय शिंदे कोण? महिलांच्या शौचालयात त्याला परवानगी कशी?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
women along with grandson killed in leopard attack in Nandurbar
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात नातवासह आजीचा मृत्यू
Nashik, Sanjay Pandey, Vichar Manch, Sanjay Pandey vichar Manch, Rashtriya Janhit Paksha, Deolali constituency,
संजय पांडे विचार मंचाची १० जागा लढण्याची तयारी
Badlapur News
Badlapur Crime : “माझ्या मुलाला सोडा, मला..” बदलापूर आंदोलनातल्या मुलाला अटक होताच आईचा आक्रोश
Female Doctor Suicide
Doctor Suicide : “डिअर अहो, बाय! मी मेल्यावर…” सात पानी पत्र लिहून डॉक्टर महिलेची आत्महत्या, पतीच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल
School Male Cleaner Abuse Girls in Badlapur
Badlapur School Case : “दादाने माझे कपडे काढले”, बदलापूर अत्याचार प्रकरणातील घाबरलेल्या मुलीने पालकांना दिली होती माहिती; FIR मध्येही नोंद!
Youth murder in Panchvati, Nashik,
नाशिक : पंचवटीत युवकाची हत्या, महिलेकडून दोन लाखाची सुपारी, चार जण ताब्यात

हेही वाचा…नंदुरबार जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात नातवासह आजीचा मृत्यू

शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने एका पालकाच्या वाहनातून शार्दुलला लॅम रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर मनीषा बोथरा यांनी तपासून घोषित केले. विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर लागलीच स्पर्धा कशी काय घेण्यात आली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सहभागी विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन याबाबत नियोजन केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.