लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक: कळवण तालुक्यातील सप्तश्रृंग गडावरील दरीत मागील आठवड्यात राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा आगाराची बस कोसळली होती. तेव्हापासून बस त्याच ठिकाणी होती. बुधवारी चार मोठ्या क्रेनच्या मदतीने बस दरीतून बाहेर काढण्यात यश आले. अपघातग्रस्त बस महामंडळाच्या ताब्यात आल्याने पुढील तपासाची दिशा स्पष्ट होऊ शकेल.

Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Rain with strong gale in Karjat taluka lightning struck house in Kopardi
कर्जत तालुक्यामध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस, कोपर्डी येथे घरावर वीज कोसळली
ST Bus exempted, road tax, ST Bus toll booths,
पथकराच्या खर्चातून एसटीची सुटका : मुंबईतील पाच टोल नाक्यावरील पथकरातून एसटीला वगळले
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Yarn mills in the state are on the verge of closure
राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!
Kalyan Crime Branch seized whale vomit from three individuals near Maurya Dhaba in dombivli
डोंबिवलीजवळ सहा कोटीची व्हेल माशाची उलटी जप्त
Devrishi killed on suspicion of witchcraft in Bhor
भोर तालुक्यात जादूटोण्याच्या संशयातून देवऋषीचा खून, मृतदेह नदीपात्रात टाकून अपघाताचा बनाव

बुलढाणा आगाराची खामगाव बस १२ जुलै रोजी सप्तश्रृंग गडावरील घाटातील गणपती टप्पा भागात दरीत कोसळली होती. या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर, २० हून अधिक प्रवासी जखमी झाले होते. चालकाला घाट वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

आणखी वाचा-भुसावळ: हतनूरच्या ४१ दरवाजांमधून विसर्ग

दरम्यान, दरीत पडलेली बस बाहेर काढण्याचे प्रयत्न बुधवारी करण्यात आले. चार मोठ्या क्रेनच्या सहाय्याने सुमारे ३०० फुट दरीत गेलेली बस काढण्यात आली. हे काम सुरू असतांना १० किलोमीटर घाटाचा रस्ता बंद करण्यात आला होता. बस काढण्याचा प्रयत्न दोन ते तीन दिवसांपासून करण्यात येत होता. परंतु, बस चिखलात असल्याने काढण्यात अडचण निर्माण होऊन क्रेनचा रोप तुटत होता. त्यामुळे बुधवारी महामंडळाने चार मोठ्या क्रेन आणून बस काढली. हे काम सुरू असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. गुरूवारपासून वाहतूक नियमितपणे सुरू राहील. यापुढे अशी घटना घडु नये यासाठी घाटात सूचना फलक आणि संरक्षक भिंती बांधण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.