सरदार कंपनीच्या सुपर फॉस्फेट खतामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या कंपनीचा राज्य परवाना निलंबित केला असला, तरी नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कृषी अधिकार्‍यांकडे करण्यात आली.

हेही वाचा >>> नाशिक: ग्रामपातळीवर निरक्षरांचा शोध, नवभारत साक्षरता अभियान; सर्वेक्षण पंधरवड्यात पूर्ण करण्याची सूचना

Sushma Andhare Maharashtra Election 2024
Sushma Andhare on Election : पुण्यात नवी कार्यालये, बैठकांनाही जोर; सुषमा अंधारे निवडणूक लढवणार का? म्हणाल्या, “माझी अपेक्षा…”
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
legal notice to cm eknath shinde including finance minister ajit pawar over ladaki bahin yojana
लाडकी बहीण योजना राजकीयदृष्ट्या प्रेरित; मुख्यमंत्र्यांसह अर्थमंत्र्यांना कायदेशीर नोटीस
Cabinet Meeting On Ratan Tata
Ratan Tata Bharat Ratna Award : उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न द्या, राज्य सरकारने केंद्र सरकारला पाठवला विनंती प्रस्ताव
dhangar reservation issue
आरक्षणाच्या मुद्द्यावरून धनगर समाज आक्रमक; आंदोलकांनी मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून सुरक्षा जाळीवर मारल्या उड्या
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Aarey - BKC Underground Metro Inauguration,
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो लोकार्पण : विरोधकांनी प्रकल्प रोखल्याने ‘मेट्रो ३’चा खर्च १४ हजार कोटींनी वाढला – पंतप्रधान मोदी
fake income tax officer raigad
रायगड, रोह्यात तोतया आयकर अधिकाऱ्यांना बेड्या…जाणून घ्या काय आहे प्रकरण…

शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष नीलेश चौधरी यांच्या नेतृत्वात नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी धरणगाव येथील तालुका कृषी अधिकार्‍यांशी भेट घेत निवेदन दिले. तालुका कृषी अधिकारी देशमाने यांच्याशी चर्चा केली. सहसंपर्कप्रमुख वाघ, चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यासह धरणगाव तालुक्यातील भोणे, बिलखेडा, धरणगाव, गंगापुरी, पष्टाणे, निशाणे आदी गावांतील शेतकर्‍यांनी पावसाळी कपाशी पिकाला सरदार कंपनीचे सुपर फॉस्फेट खत दिले. त्यामुळे कपाशीची वाढ खुटणे, पोकळासारखा आकार होणे, मध्यभागी अंकुर न येणे, झाडे पिवळी पडणे, अशी लक्षणे दिसत आहेत. पूर्ण क्षेत्र खराब होत आहे. शेतकर्‍यांना जास्तीत जास्त भरपाई द्यावी, अशी मागणी केली. 

हेही वाचा >>> नाशिक: अल्प दरात विमान तिकीटाच्या आमिषाने भुर्दंड, दहा विद्यार्थ्यांच्या पालकांची फसवणूक

देशमाने यांनी, सर्व शेतकर्‍यांची तक्रार घेऊन शेतात पाहणी करून, कृषी अधीक्षकांना ताबडतोब अहवाल पाठवतो. संबंधित यंत्रणेकडून पंचनामे करून जास्तीत जास्त भरपाई कशी मिळेल, यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याप्रसंगी ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शहरप्रमुख भागवत चौधरी, संतोष सोनवणे, गजानन महाजन, गोपाल पाटील, शरद शिरसाट, विलास पवार यांच्यासह यज्ञेश्वर पाटील, विलास पाटील, मनोहर पाटील (गंगापुरी) आदींसह बाधित शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.