नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांसाठी निश्चित केलेले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाची हिंदू मते वळविण्याचे समीकरण मांडण्यात आले असून तसा ठरावांमध्येही उल्लेख करण्यात आला आहे.नाशिक येथे आयोजित भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आलेल्या ठरावांची माहिती राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी दिली. विविध विषयांवर भ्रम निर्माण करणारे राजकीय शुक्राचार्य मोठय़ा संख्येने सभोवताली असून त्यांच्यापासून जनतेने सावध राहण्याचा इशाराही भाजपने दिला आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात कृषी धोरण, राज्यात अवघ्या सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिलेली भरीव मदत याबद्दल मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या अभिनंदनाचा कृषी-सहकारविषयक ठराव मंजूर करण्यात आला.

आगामी निवडणुकीत भाजपने जे लक्ष्य निश्चित केले आहे ते कसे साध्य केले जाईल याचे समीकरण तावडे यांनी मांडले.मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी, महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांना तुरुंगात डांबण्यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना सर्वोच्च पातळीवरून जबाबदारी दिली गेल्याचा आरोप केला. महाविकास आघाडी सरकारचे सुडाचे राजकारण किती भयानक होते, हे स्पष्ट होते, असे ते म्हणाले. महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या सूडपर्वाचा कार्यकारिणीने निषेध केला. गेल्या सात महिन्यांत घेतलेल्या निर्णयांचा उल्लेख करीत महाराष्ट्रालापुन्हा प्रगतिपथावर आणल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे अभिनंदन करण्याचा ठराव करण्यात आला.

Amit Thackeray on Ajit Pawar
Amit Thackeray: ‘स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही’, अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हरलो तरी..”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Devendra Fadnavis to Inaugurate TJD Deccan Summit 2025
ठाकरे, पवारांचे आधीच ठरले होते, मुख्यमंत्री फडणवीस यांचे मोठे वक्तव्य !
Why Shiv Sena Thackeray group leaders are not stopping their party defection
ठाकरे गटातील गळती का थांबत नाही ?
raj thackeray urges writers to speak on political issues
सरकार कोणाचेही असो, बोलले पाहिजे! मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे साहित्यिकांना आवाहन
Uddhav Thackeray, Ahilyanagar, existence,
अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला गळती, अस्तित्वाचा प्रश्न
Amol Mitkari Taunts Raj Thackeray
Raj Thackeray : “राज ठाकरेंनी त्यांच्या सुपुत्राचा पराभव का झाला आणि मनसेचा…”, राष्ट्रवादीच्या नेत्याचा टोला
Raj Thackeray Speech News
Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य, “अजित पवार यांचे ४२ आमदार आणि शरद पवारांचे १० आमदार हे कसं शक्य आहे? लोकांनी…”

समीकरण काय?
२०१४ मध्ये भाजपला २८ टक्के मिळाली होती. तेव्हा शिवसेनेला १९ टक्के, काँग्रेसला १८ तर, राष्ट्रवादीला १७ टक्के मते मिळाली होती. शिवसेनेने हिंदूत्वाच्या विचाराशी तडजोड करीत काँग्रेस, राष्ट्रवादीशी हातमिळवणी केली. त्यामुळे हिंदू मते भाजपकडे वळवून २८ टक्क्यांवरून ती ४५ ते ५० टक्के करणे यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे विनोद तावडे यांनी सांगितले.

Story img Loader