लोकसत्ता वार्ताहर

धुळे: जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे १० दरवाजे एका मीटरने उघडण्यात आल्याने तापी नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. तापी नदी धुळे जिल्ह्यातून जात असल्याने जीवित किंवा वित्तहानी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 

Will there be high sowing in Rabi season this year
यंदाच्या रब्बी हंगामात उच्चांकी पेरण्या होणार?
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी
pcmc to construct biodiversity park in talawade says commissioner shekhar singh
पिंपरी : तळवडेत साकारणार जैवविविधता उद्यान; स्वच्छतेची कामे करणाऱ्या कंपनीला ७६ कोटींचे काम
Seven million cubic meters of water from Ulhas River is reserved for Ambernath and Badlapur
बदलापूर, अंबरनाथला मिळणार अतिरिक्त पाणी उल्हास नदीतून आरक्षण मंजूर, योजना मार्गी लागणार
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
MHADAs Mumbai Board of Housing applications deadline extended by 12 hours
म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांचे अर्ज करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! अर्ज भरण्यासाठीची मुदत १२ तासांनी वाढवली
diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी

गुरुवारी हतनूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने सकाळी पाच वाजता धरणाचे १० दरवाजे प्रत्येकी एका मीटरने उघडण्यात आले. यामुळे १९७७९ क्यूसेस वेगाने विसर्ग तापी नदीपात्रात होत आहे. सद्यस्थितीत सुलवाडे बॅरेज मध्यम प्रकल्पाचेही चार दरवाजे अर्धा मीटर उंचीने उघडून ६६६७.८३ क्युसेस इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आला आहे.

हेही वाचा… लाच प्रकरणी महिला तलाठीसह तिघांविरुध्द गुन्हा; धुळे जिल्ह्यातील घटना

पाण्याचा वेग लक्षात घेता सुलवाडे प्रकल्पातून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पुढील तीन तासात विसर्ग वाढविण्यात येईल. यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरेढोरे सोडू नयते अथवा नदीपात्रामध्ये जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.