लोकसत्ता वार्ताहर

मनमाड: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. अर्ज माघारीच्या वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर झालेली हाणामारी गाजली असतांनाच आता या निवडणुकीसाठी मतदानाचे स्थळ हे शहराच्या एका टोकाला बाजार समितीपासून दोन किलोमीटर अंतरावर ठेवण्यात आले आहे. त्याची वेगळी चर्चा सुरू झाली आहे. सोसायटी व ग्रामपंचायत गटातील अंतर्धान पावलेल्या बहुतांश मतदारांची इगतपुरीतील अलिशान ठिकाणी बडदास्त ठेवली गेली आहे. अशा मतदारांना एकाच वेळी मतदानाला आणले जाईल. संबंधितांच्या बस व वाहनांचा विचार करून मोकळे मैदान असणारे केंद्र निवडल्याची चर्चा रंगली आहे.

Navi Mumbai Municipal Corporation will have to help in 14 villages in case of emergency
नवी मुंबई : आपत्कालीन स्थितीत १४ गावांत महापालिकेचीच धाव!
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
animal husbandry land, MIDC, Kaustubh Divegaonkar,
पशुसंवर्धनची जमीन एमआयडीसीला देण्यास विरोध केल्यामुळे कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली ?
Plot to Mumbai Bank despite violation of MHADA Act Mumbai news
म्हाडा कायद्याचे उल्लंघन करून ‘मुंबै बँके’ला भूखंड! प्रतीक्षानगर येथील जागेचे थेट वितरण
navi Mumbai, pressure from politicians
पुनर्विकास प्रकल्पात राजकीय झुंडशाही? ठरावीक बिल्डर, कंत्राटदारांसाठी दबावाचा आरोप
Jagdish Muliks hopes increased after Pankaja Munde is given responsibility of three constituencies in Pune
मुंडेंकडे जबाबदारी अन् मुळीकांच्या आशा पल्लवीत! वडगावशेरीमध्ये महायुतीत चुरस
Shinde group MLA Sanjay Gaikwad cleaning car from the security guard video viral buldhana
शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड पुन्हा चर्चेत, सुरक्षा रक्षकाकडून गाडीची स्वच्छता, चित्रफित व्हायरल
Navi Mumbai schools CCTV, Sakhi Savitri Committee,
नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष

याआधी मतदानाची तारीख २८ एप्रिल होती. ती ३० एप्रिल करण्यात आली. त्यानंतर मतमोजणीची तारीख सर्व ठिकाणी ३० असतांना मनमाड बाजार समितीसाठी मात्र एक मे ठेवण्यात आली आहे. आता रंगली आहे ती ठिकाणाची चर्चा.

आणखी वाचा-कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक, नऊ पैकी पाच बाजार समित्या बिनविरोध

मनमाड नगरी ही वेगळी असल्याचे नेहमी म्हटले जाते. ते येथील जागरूक राजकारण्यांमुळे. राज्यातील कोणत्याही बदलत्या राजकारणाचे पडसाद हे मनमाड शहरात सर्वप्रथम पडतात. आताही तसेच घडले आहे. बाजार समिती स्थापन होऊन ३८ वर्षे झाली. अजूनही अनेक संचालक हे अनेकदा फेरनिवड झालेले आहेत. तर काही वारसा हक्काने जणू उमेदवारी करीत निवडून येत आहेत. पण बाजार समितीच्या समस्या मात्र स्थापन झाल्यापासून जशा आहे तशाच आहेत.

३० एप्रिलला होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मनमाड कृउबा निवडणुकीत विद्यमान शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी विकास पॅनलने कपबशी ही निशाणी घेतली आहे. तर त्याविरूध्द अनिल आहेर, संजय पवार, राजेंद्र देशमुख, पंकज भुजबळ, जगन्नाथ धात्रक या पाचही माजी आमदारांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी प्रणित परिवर्तन पॅनलने छत्री ही निशाणी घेतली आहे. या निवडणुकीत सोसायटी गटातील ११ जागांसाठी २५ उमेदवार, ग्रामपंचायत गटातील चार जागांसाठी १०, व्यापारी गटातील दोन जागांसाठी चार तर हमाल मापारी गटातील एका जागेसाठी दोन असे एकूण १८ जागांसाठी ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

आणखी वाचा- मनपा प्रवेशव्दाराला कुलूप लावणार, अधिकाऱ्यांना काळे फासणार- आमदार फारुक शहा यांचा इशारा

मतदारांना कित दर, याची लाखालाखांची उड्डाणे सुरू आहेत. तर सोसायटी व ग्रामपंचायत गटातील ८० टक्के मतदार हे अज्ञातस्थळी हलविण्यात आल्याची चर्चा आहे. मतदारांना इगतपुरीनजिकच्या निसर्गरम्य ठिकाणाजवळील पंचतारांकीत सुखसोयींनीयुक्त ठिकाणी ठेवल्याचे सांगितले जाते. या पार्श्वभूमीवर ३० तारखेला मतदानाच्या दिवशी तसेच एक मे रोजी मतमोजणीच्या वेळी मोठे मोकळे मैदान लागण्याची शक्यता गृहीत धरून निवडणूक निर्णय अधिकार्यांनी ऐनवेळी मतदानाचे ठिकाण आता बाजार समिती पासून दोन किलोमीटरवरील मनमाड-येवला रस्त्यावरील कॅम्प विभागातील सेंट झेवियर्स हायस्कूल हे निवडले असून मतमोजणीही दुसर्या दिवशी त्याच ठिकाणी होणार आहे.

वाहनांसाठी अट्टाहास का ?

मतदान आणि मतमोजणीचे ठिकाण एवढ्या लांब का ठेवण्यात आले, त्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मतदानाच्या दिवशी बाहेरगावी कॅम्प लावून ठेवण्यात आलेल्या सोसायटी गटांतील २९५ मतदारांना घेऊन येणार्या सुमारे १० गाड्या तर ग्रामपंचायतीच्या २१० मतदारांसाठीच्या सात बस, व्यापारी गटांतील १४७ मतदार व हमाल मापारी गटांतील १३५ मतदारांना मतदानासाठी घेवून येणार्या शंभरावर चारचाकी गाड्यांच्या ताफ्याला तेवढेच मोठे वाहनतळ हवे म्हणून मतदानासाठीचे ठिकाण हे वरीलप्रमाणे दूरदृष्टी ठेवून निवडण्यात आले आहे. तेथे मोकळे मैदान असून त्या ठिकाणीही वाहनतळाची व्यवस्था होवू शकेल, असा विश्वास निवडणूक निर्णय अधिकार्यांना वाटत असावा. त्यामुळेच सेंट झेवियर्स हायस्कूल या केंद्रावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

मनमाड बाजार समिती निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणीसाठी मनमाड कॅम्प विभागातील सेंट झेवियर्स हायस्कूल हे ठिकाण निश्चित करण्यात आले आहे. -सिध्दार्थ मोरे ( निवडणूक निर्णय अधिकारी)