लोकसत्ता वार्ताहर

धुळे: केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कवाढ रद्द न केल्यास सत्ताधारी नेत्यांना शेतकरी गावात फिरु देणार नाही, असा इशारा देत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदाफेक आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना माजी आमदार प्रा. शरद पाटील यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. जिल्ह्यात कांदा उत्पादकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून केंद्र सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावल्याने कांद्याचे दर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली आहे.

Food and Drug Administration seized 285 liters of adulterated milk in Mumbai news
मुंबईत २८५ लिटर भेसळयुक्त दूध जप्त; अन्न व औषध प्रशासनाची मालाडमध्ये कारवाई
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Badlapur Harassment case Suspension of Thane Education Officers for evading case responsibility Mumbai news
बदलापूर अत्याचार प्रकरण: जबाबदारी झटकल्याने ठाणे शिक्षणाधिकाऱ्यांचे निलंबन, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
uran farmers land marathi news
‘सेझ’च्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत द्या, सुनावणी करण्याचे उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
Union Minister Of port and shipping approved wage hike of port and dock workers
बंदर, गोदी कामगारांना साडेआठ टक्के वेतनवाढ, केंद्रीय बंदर व जहाजमंत्र्यांची मंजुरी
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
Mumbai, Sanjay Gandhi National Park, slum rehabilitation, High Court order, illegal encroachments, forest management, state government,
राष्ट्रीय उद्यान अतिक्रमणमुक्त करण्याचे आदेश, बेकायदा झोपडीधारकांच्या तातडीच्या पुनर्वसनासाठी धोरण आखण्याबाबत सूचना

मागील काही दिवसांपासून कवडीमोल भावाने कांद्याची विक्री सुरु होती. कांद्याला पंधरवड्यापासून बऱ्यापैकी भाव मिळू लागताच केंद्राने निर्यात शुल्क ४० टक्के केले. एप्रिल ते जुलै या कालावधीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक कांदा सडल्याने फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. चांगल्या प्रतीचा कांदा फार कमी प्रमाणात शेतकऱ्यांकडे शिल्लक राहिला होता. या कालावधीत २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटल दराने शेतकऱ्यांना कांदा विकावा लागला.

हेही वाचा… धुळ्यातून चार दुचाकींची चोरी

केंद्र सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. निर्णयाला केंद्र शासनाने त्वरीत स्थगिती द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर अतुल सोनवणे, बाबाजी पाटील, विलास चौधरी, नाना वाघ, महेश मिस्तरी आदींची स्वाक्षरी आहे.