लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : महाराष्ट्राला मोठी संत परंपरा असून त्यांच्याच आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे. त्यामुळे राज्यात संतांच्या केसांनाही धक्का लावण्याची हिंमत कोणी करणार नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सदगुरु गंगागिरी महाराज संस्थानतर्फेसिन्नर तालुक्यातील पंचाळे येथे आयोजित हरिनाम सप्ताहात त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. या संस्थानचे मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांच्याविरोधात अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्यावरून निदर्शने होत असून त्यांच्याविरुध्द येवला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हरिनाम सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी रामगिरी महाराजांच्या कार्याचे कौतुक केले.

Balasaheb Thorat, Gulabrao Patil, Finance Minister,
महायुतीने राज्य बरबाद करण्याचे काम केले, अर्थमंत्र्यांबाबत मंत्री गुलाबराव पाटलांच्या वक्तव्याचे मी समर्थन करतो – बाळासाहेब थोरात
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
supreme court on governor marathi news
चतुःसूत्र: राज्यपाल न्यायिक पुनरावलोकनाच्या कक्षेत
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…
PM Modi participate in Lakhpati Didi Sammelan at Jalgaon
मुख्यमंत्र्यांच्या मागण्यांकडे पंतप्रधानांचे दुर्लक्ष; शेतकऱ्यांविषयी प्रश्नांबाबत भाषणात अवाक्षरही नाही

सात दिवसांपासून चाललेल्या सप्ताहात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुक्रवारी हजेरी लावली. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय, हरिनाम सप्ताहाचे महत्व अधोरेखीत करुन १७७ वर्षांपासून ही परंपरा कायम ठेवल्याबद्दल रामगिरी महाराजांचे अभिनंदन केले. संत पाठिशी असले की आशीर्वाद, ऊर्जा व प्रेरणा मिळते. आपण राजकारणात, मुख्यमंत्री असलो तरी तुमचे स्थान, अध्यात्मिक अधिष्ठान मोठे आहे. डोक्यावर मंडप नसताना उन्हाची तमा न बाळता ४० लाख लोक या सप्ताहात सहभागी झाले, असे शिंदे यांनी सांगितले.

आणखी वाचा-बांगलादेशात हिंदुंवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंदला हिंसक वळण; पोलिसांकडून लाठीमार, नाशिकमध्ये तणावपूर्ण शांतता

संस्थान परिसरात विकास कामांसाठी १५ कोटी रुपये दिले जातील. २०२३-२४ मधील वारीत सहा वारकऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाख रुपये देण्याची घोषणाही शिंदे यांनी केली.