इगतपुरीत तलावात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. रमीज अब्दुल शेख (३६, रा. भिवंडी) आणि नदीम अब्दुल शेख (३४, रा. भिवंडी), शाहनवाज शेख (४१, रा. इगतपुरी) असे मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

हेही वाचा- नाशिक : शालेय परिसरात टवाळखोराची विद्यार्थिनीला धमकी; गुन्हा दाखल

ulta chashma
उलटा चष्मा: ‘पुन्हा संधी’ नकोच!
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
vehicle stolen Pune, bikes Theft pune,
पुणे : सणासुदीत वाहन चोरट्यांचा उच्छाद, ११ दुचाकी, दोन रिक्षांची चोरी
Lakadganj police station is in discussion due to the controversial affairs
नागपूर : गंगाजमुनातील वारांगना; पोलिसांचा छापा अन् ग्राहकांची पळापळ…
police arrested man who chased and molested minor girl walking on road in Kalyan east on Tuesday
कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरूणाला अटक
Deonar Pada cemetery, Deonar Pada cemetery lights,
मुंबई : देवनार पाडा स्मशानभूमी अंधारात, विजेचे दिवे बंद असल्याने नागरीकांना मनस्ताप
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
After bitten by snake man held by police
साप चावल्यावर रुग्णालयात जाताना पोलिसांनी पकडलं; मद्यपानाचा आरोप ठेवून लाच मागितली, रुग्णाचा वाटेतच मृत्यू

इगतपुरी येथील रहिवासी शाहनवाज शेख यांच्याकडे त्यांचे काही नातेवाईक आले होते. सकाळी नऊच्या सुमारास नातेवाईक नगरपरिषद तलाव परिसरात फिरण्यासाठी गेले असता त्यातील रमीज आणि नदीम दोघांनी तलावात कडेला उभे राहुन छायाचित्र काढण्यास सुरुवात केली. असे करताना यांचा तोल गेला. ते पाहून मामा शाहनवाज त्यांना वाचविण्यासाठी गेले असता तेही बुडाले. सोबत असलेल्यांनी आरडाओरड केल्यावर काही युवकांनी तलावात उड्या घेत तिघांना बाहेर काढले. रुग्णवाहिकेतून तत्काळ तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वेद्यकीय अधिकाऱ्यांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.

हेही वाचा- जळगाव : सिहोरहून परतताना अपघातात पातोंड्याच्या दोन महिलांचा मृत्यू, पाच जण गंभीर जखमी

यानंतर मृतांच्या नातेवाईकांनी स्थानिकांसह रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांसह वैद्यकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून उपचाराबाबत माहिती विचारून रुग्णालयात कुठल्याही प्रकारच्या सुविधा नसल्याचा आरोप केला. करोना काळात अनेकांनी ग्रामीण रुग्णालयात प्राणवायू सिलिंडरसह अनेक आरोग्य सुविधा दिल्या होत्या. त्या गेल्या कुठे, असा प्रश्न करीत आमदारांना शहरात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा जमावाने दिला. अनेकांच्या मध्यस्थीने अखेर मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी संमती दर्शविली. यावेळी नायब तहसीलदार प्रविण गोंडाळे, पोलीस निरीक्षक वसंत पथवे, उपनिरीक्षक राजाराम दिवटे, सोपान राखोंडे यांसह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.