जळगाव – जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. भुसावळ नदीपात्रात दोन मुलांचा, तर जळगावनजीक गिरणा नदीपात्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या संदर्भात पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सध्या तापमानाने उच्चांकी पातळी गाठली आहे. त्यामुळे अनेक जण नदीपात्रात पोहण्यासाठी जात असल्याचे चित्र आहे. भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. दानिश शेख जब्बार (१७) व अंकुश ठाकूर (१७, दोघे रा. खोली, खडका रोड, भुसावळ) अशी मृत मुलांची नावे आहेत. तापी नदीवरील जुन्या पुलाच्या भागात जलसाठा असल्याने खडका रोड भागातील काही तरुण तेथे पोहण्यासाठी गेले होते. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील रहिवाशांनी धाव घेत वाचविण्याचा प्रयत्न केला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा