नाशिक – बंधाऱ्यात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या त्याच्या आईने धाव घेतली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला महिलेचा भाऊही पाण्यात उतरला. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. मायलेकासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे घडली.

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे अंबादास खरात (२९, दहेगाव, नांदगाव), इंदुबाई विटणर (३५, खिर्डी, नांदगाव) आणि वाल्मिक विटणर (१५, खिर्डी,नांदगाव) हे तिघे बाणगंगा नदीच्या कडेला मेंढ्या चारत होते. मुलगा वाल्मिक हा एका मेंढीला धुण्यासाठी बंधाऱ्यात घेऊन गेला. अंदाज न आल्याने तो पाण्यात पडून बुडू लागला. हे पाहून त्याची आई इंदुबाई यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्याही बुडू लागल्या. हे दृश्य पाहून वाल्मिकच्या मामीने जोरजोरात आरडाओरड सुरू केली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला वाल्मिकचा मामा अंबादास थोरात याने पाण्यात उडी घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा – बंडखोरी टाळण्यासाठी पक्षांकडून कालापव्यय, जिल्ह्यातील अनेक जागांवर घोळ कायम

बंधाऱ्यात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या मुलाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडू लागल्याने बाजूलाच उभ्या असलेल्या त्याच्या आईने धाव घेतली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला महिलेचा भाऊही पाण्यात उतरला. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने त्याचे प्रयत्न व्यर्थ गेले. मायलेकासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे घडली.

हेही वाचा – काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा सांगली प्रारुपसाठी आग्रह, पक्ष निरीक्षकांकडून सबुरीचा सल्ला

नांदगाव तालुक्यातील बाणगाव येथे अंबादास खरात (२९, दहेगाव, नांदगाव), इंदुबाई विटणर (३५, खिर्डी, नांदगाव) आणि वाल्मिक विटणर (१५, खिर्डी,नांदगाव) हे तिघे बाणगंगा नदीच्या कडेला मेंढ्या चारत होते. मुलगा वाल्मिक हा एका मेंढीला धुण्यासाठी बंधाऱ्यात घेऊन गेला. अंदाज न आल्याने तो पाण्यात पडून बुडू लागला. हे पाहून त्याची आई इंदुबाई यांनी मुलाला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र त्याही बुडू लागल्या. हे दृश्य पाहून वाल्मिकच्या मामीने जोरजोरात आरडाओरड सुरू केली. बाजूलाच मेंढ्या चारत असलेला वाल्मिकचा मामा अंबादास थोरात याने पाण्यात उडी घेत दोघांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यालाही पोहता येत नसल्याने तिघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने तीनही मृतदेह बाहेर काढण्यात आले. नांदगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.