नाशिक : शहराचा रखडलेला विकास, स्मार्ट सिटी योजनेच्या कामांचा केवळ गवगवा, याकडे लक्ष वेधण्यासाठी शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने शहरात चार फूट दुर्बिणींने चला शोधूया स्मार्ट नाशिक हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या कारभारामुळे नाशिककर हैराण झाले आहेत. एकिकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा गाजावाजा करत करोडो रुपये खर्च केले जात असताना नाशिककरांना मात्र त्रासाला सामोरे जावे लागत आहे. महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीला नाशिककरांशी कुठलेही देणेघेणे नसून केवळ मनमानी कारभार करण्यात येत असल्याचा आरोप करुन निषेधार्थ चार फूट दुर्बिणीतून चला शोधूया स्मार्ट नाशिक हे आंदोलन शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने पंचवटीतील निमाणी बस स्थानक येथे करण्यात आले.

Public Works Minister Ravindra Chavan confession that it will take two years for the Mumbai to Goa highway to be completed
मुंबई- गोवा महामार्ग पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षे; सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची कबुली
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
traffic route changes in nagpur
नागपूर : ‘लाडक्या बहिणी’च्या सुरक्षेसाठी ‘या’ मार्गांवर राहणार बंदी…
case against contractor for mumbai goa highway poor quality work
मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल; अभियंता सुजित सदानंद कावळे यांना अटक
Nagpur, Bombay High Court, MSRDC, Nagpur Bench of Bombay High Court, Samruddhi mahamarg, vehicle inspections, Transport Department, Public Interest Litigation,
उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचा समृद्धी महामार्गावरून प्रवास, अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल….
Narayan Rane on Statue Collapse
Narayan Rane Reaction on Statue Collapse : “असं पहिल्यांदा घडलंय का? काँग्रेसच्या काळात तर…”, पुतळा कोसळल्याप्रकरणी नारायण राणेंचं वक्तव्य
Nashik, Citylink, State Transport, Maha Mela, mukhya mantri Mahila Sashaktikaran Abhiyan, Tapovan Maidan, Ladaki Bahin Yojana, bus shortage, passenger disruption,
लाडक्या बहिणींच्या वाहतुकीमुळे बसेसची कमतरता विद्यार्थी, प्रवाशांचे हाल
Raigad, Mumbai-Goa highway,
रायगड : संतापलेल्या आंदोलकांनी मुंबई गोवा महामार्ग रोखला

हे ही वाचा…गणेशोत्सवात नाशिकमध्ये मध्यवर्ती रस्त्यांवर वाहतुकीचे निर्बंध – दुपारी तीन ते रात्री १२ वेळेत प्रवेश बंद

नागरिकांनी या आंदोलनात सहभाग घेतला. स्मार्ट सिटीच्या कामांमुळे शहरात काही ठिकाणी जो बकालपणा आला, त्यास जबाबदार कोण, एकीकडे स्वच्छतेच्या नावावर करोडो रुपये खर्च केले जात असताना दुसरीकडे स्वच्छ शहरांच्या यादीत नाशिक शहर २३ व्या स्थानावर का, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या नावाखाली करोडो रुपयांचे यांत्रिक झाडू महानगरपालिकेने घेतले. ते धूळखात पडून असल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले.

हे ही वाचा…पाणी वितरणातील गोंधळ दूर करा, मग सल्ले द्या…; नाशिक महापालिकेच्या दाव्यावर भाजप आमदारांचे टिकास्त्र

आंदोलनाचे नेतृत्व नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष आकाश छाजेड, शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केले. यावेळी छाजेड यांनी, महापालिकेचा भोंगळ कारभार आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार यामुळे नाशिकचा विकास थांबला असल्याची टीका केली. शहराचे रस्ते उघडले गेले असतानाही महानगर प्रशासनाला जाग नाही. यापुढे काँग्रेसचे कार्यकर्ते प्रशासनाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा छाजेड यांनी दिला. डॉ. ठाकूर यांनी, आंदोलनात प्रतिकात्मक दुर्बिण असली तरी नागरिकांनी आता प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजे, असे सांगितले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शाहू खैरे, प्रदेश काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे आदी यावेळी उपस्थित होते.