नाशिक – कसारा ते इगतपुरी दरम्यान घाटात मुंबईकडून येणाऱ्या रेल्वे मार्गावर सायंकाळी मालगाडीचे सात डबे घसरल्याने प्रवासी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. अनेक गाड्या वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर रोखून धरण्यात आल्या. कल्याण आणि इगतपुरी स्थानकावरील दुर्घटना सहायता गाडी अपघातस्थळी रवाना करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> जळगावात तरुणाचा खून; दोन जण जखमी

local train services on western and harbour line disrupted due to power outage
Mumbai Local Train Update : पश्चिम रेल्वे, हार्बर मार्ग विस्कळीत
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Mumbai, local train, Central Railway, Harbor Line, overhead wire, Mankhurd, Overhead Wire Breaks Between Mankhurd and Vashi, Vashi,
ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेवरील हार्बर मार्गाची वाहतूक विस्कळीत, जवळपास दोन तास प्रवाशांचा खोळंबा
Uran Panvel road work
जासई शंकर मंदिर उभारणीसाठी ठोस निर्णय हवा, जेएनपीए प्रशासनाकडे जासई ग्रामस्थांची मागणी
22 local trains on Western Railway cancelled
Mumbai Local : पश्चिम रेल्वेवरील २२ लोकल फेऱ्या रद्द
pothole, Taloja flyover, Panvel, Taloja flyover news,
पनवेल : तळोजा उड्डाणपुलावर भगदाड
Escalators, Kalyan Railway Station, Kalyan,
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर सरकत्या जिन्यांची उभारणी
Canal form in Nashik to flyover on Mumbai-Agra highway
मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलास नाशिकमध्ये कालव्याचे स्वरुप, तोडगा कसा निघणार?

रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कसारा घाटातील एका मार्गावर ही दुर्घटना घडली. मालगाडीचे सात डबे रुळावरून घसरले. कसारा ते इगतपुरी दरम्यान घाटात तीन रेल्वेमार्ग आहेत. मालगाडी कसाऱ्याहून इगतपुरीकडे येणाऱ्या मार्गावरून घसरली. त्यामुळे मुंबईकडून नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली. त्याचा परिणाम घाटातील मध्य मार्गावर झाला असून तो मार्ग सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इगतपुरीकडून कसाऱ्याकडे जाणारी रेल्वे वाहतूक सुरू आहे. या अपघाताचा उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. परंतु, मुंबईकडून नाशिकमार्गे जाणाऱ्या प्रवासी गाड्यांची वाहतूक विस्कळीत झाली. मुंबई-हावडा, अदिलाबाद-नंदीग्राम, मुंबई-गोंदिया विदर्भ, मुंबई-मनमाड-पंचवटी, मुंबई-नांदेड, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, लोकमान्य टिळक टर्मिनस-प्रतापगड अशा एक्स्प्रेस उंबरमाळी, घाटकोपर, विक्रोळी आदी विविध स्थानकांवर रोखून धरण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. यात मुंबई-नांदेड एक्स्प्रेस, मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेस, मुंबई-फिरोजपूर पंजाब मेल, मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. अमरावती, हावडा, सिकंदराबाद, शालिमार, वाराणसी, पाटलीपुत्र एक्स्प्रेस या गाड्याही वळविण्यात आल्या आहेत. कल्याण स्थानकापलीकडे असणाऱ्या चार गाड्या वळवल्या जाऊ शकत नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.