नाशिक पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात संघर्ष पाहायला मिळत आहे. आधी ही केवळ तांबे कुटुंबाची बंडखोरी मानली जात होती. या काळात बाळासाहेब थोरात यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र, आता थोरात यांनीही सत्यजीत तांबेंची बाजू घेत राजकारण झाल्याचा आरोप केला. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडलेले दिसत आहेत. याचीच प्रचिती करणारं ट्वीट काँग्रेसच्या सरचिटणी, प्रवक्त्या आणि नाशिकच्या नगरसेविका हेमलात पाटील यांनी केलं आहे.

हेमलता पाटील म्हणाल्या, “आज सकाळी सकाळी फोन आला, ‘ताई आपण बाळासाहेबांच्या कॉंग्रेसचे काम करायचे, की नानांच्या कॉंग्रेसचे?’ आता काय उत्तर देऊ कप्पाळ?”

Eknath shinde loksatta news
रायगड, नाशिकच्या पालकमंत्रीपदांचा तिढा लवकरच सुटेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Mother left her children on road and ran away motherhood shocking video viral on social media
“त्यापेक्षा जन्मच नव्हता द्यायचा ना”, तिला पोटच्या मुलांचीही नाही आली दया, निष्ठूर आईचा धक्कादायक VIDEO व्हायरल
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Parents congratulated their children for not coming home on time
‘पप्पा, मला माफ करा…’ मुलं वेळेवर घरी आली नाहीत म्हणून आई-वडिलांनी केला सत्कार… VIDEO पाहून येईल हसू
Little boy crying a school telling teacher about fathers abuse and asking not to beat video viral on social media
“मग माझ्या बापालाच फोन करा की…”, ढसाढसा रडत शाळेतील मुलाची शिक्षिकेकडे विनवणी; VIDEO मध्ये पाहा चिमुकल्याचं नेमकं म्हणणं काय?
Girish Mahajan On Nashik and Raigad Guardian Minister
Girish Mahajan : नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटेल? गिरीश महाजनांचं मोठं विधान; म्हणाले, “आता हा प्रश्न…”
Sandeep Deshmukh Wardha district Ajit Pawar NCP group
वर्धा जिल्ह्यात सहकार गटात उभी फूट, एकाच घरी दोन झेंडे

हेमलात पाटील यांच्या या ट्वीटनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे. या ट्वीटवर प्रतिक्रिया देणाऱ्यांपैकी कुणी म्हटलं भाजपाबरोबर असणाऱ्यांचं काम करू नका, कुणी म्हटलं नाना पटोलेंच्या काँग्रेसचं काम करा, कुणी म्हटलं काँग्रेसचं काम करा, तर कुणी म्हटलं हे सर्व नाट्य थांबवा, काहीतरी मार्ग निघेल.

हेही वाचा : महिन्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात का? नेमकं काय झालंय? बाळासाहेब थोरातांनीच सांगितलं कारण, म्हणाले…

काय म्हणाले बाळासाहेब थोरात?

दरम्यान, काँग्रेसमधील बंडखोरीवर बाळासाहेब थोरात म्हणाले, “विधान परिषदेच्या निवडणुकीवेळी मोठं राजकारण झालं. सत्यजीत तांबे या निवडणुकीत चांगल्या मतांनी विजयी झाले. मी त्यांचं अभिनंदन करतो. मात्र, जे राजकारण झालं, ते व्यस्थित करणारं होतं. मी याबाबत माझी भूमिका पक्षश्रेष्ठींकडे मांडली आहे. हे पक्षीय राजकारण आहे. त्यामुळे यावर बाहेर बोललं पाहिजे.”

“या मताचा मी नाही. याबाबत पक्षातील नेत्यांबाबत बोलणं झालं असून योग्य तो निर्णय होईल. तसेच गेल्या काही दिवसांत काही लोकांना आपल्याबद्दल गैरसमज पसवण्याचं काम केलं. मात्र, काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि आपली पुढेची वाटचालही याच विचाराने होणार आहे,” असंही थोरातांनी नमूद केलं.

हेही वाचा – “राष्ट्रहिताकरिता साहित्यिकांनी प्रखरपणे विचार मांडावे”, साहित्य संमेलनात नितीन गडकरींनी व्यक्त केलं मत; म्हणाले, “देशाची लोकशाही…”

“महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर मोठ्या प्रमाणात राजकारण होतं आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. त्यांना अडचणीत आणलं जात आहे. त्यांचे उद्योग बंद पाडण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र, आपण अनेकदा संघर्ष केला आहे. संघर्षातूनच आपण मोठं झालो आहे. त्यामुळे या संघर्षातून आपण नक्कीच बाहेर येऊ, असा मला विश्वास आहे,” असेही ते म्हणाले.

Story img Loader