नाशिक : जिल्ह्यात मुंबई-नाशिक महामार्गावर कसारा घाटात गुरुवारी झालेल्या अपघातात दोन जैन साध्वींचा मृत्यू झाला. कसारा घाटातील हॉटेल आँरेजसमोर पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात झाला. कसारा घाटातून नाशिक येथील पवननगर स्थानकात चातुर्मास कार्यक्रमासाठी सिद्धाकाजी आणि हर्षाईकाजी महाराज या नाशिककडे पायी प्रवास करुन येत होत्या. कसारा घाटात त्या आल्या असता एका कंटेनरने खासगी मालवाहू वाहनाला आणि कारला धडक दिली. त्यानंतर पायी चालणाऱ्या महिला साध्वींना धडक बसली. या अपघातात त्यांचा जागेवरच मृत्यू झाला. इगतपुरी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
First published on: 08-06-2023 at 15:44 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two jain sadhvis died in an accident at kasara ghat ysh