लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : मुंबईची परसबाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यात दुष्काळी स्थितीमुळे भाजीपाला उत्पादनात कमालीची घट झाली असून त्याचा परिणाम मुंबईसह इतरत्र पुरवठ्यावर होत आहे. त्यातच आता पावसामुळे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक ४० ते ५० टक्क्यांनी कमी झाली असून दरही कडाडले आहेत. परिणामी, भाजीपाला खरेदीत गृहिणींना हात आखडता घ्यावा लागत आहे.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
AJit pawar and uddhav thackeray
नाशिक शिक्षक मतदारसंघ! मविआच्या उमेदवाराला अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याचा पाठिंबा? वाढदिवसानिमित घेतलेली भेट चर्चेत!
Mumbai girl suicide marathi news
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीने १० व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवलं, मंत्रालयासमोरची घटना
uddhav thackeray chhagan bhubal
छगन भुजबळ शिवसेनेत येणार? संजय राऊत म्हणाले, “त्यांच्या मनात खदखद आहे, पण…”
uddhav thackeray prakash ambedkar (2)
“गरज सरो वैद्य मरो”, प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर आक्षेप; म्हणाले, “तुमचे पक्ष वाचवण्यात…”
Maratha Reservation Activist Prasad Dethe Suicide News in Marathi
Prasad Dethe: “चिऊ मला माफ कर, जरांगे तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय..”; भावनिक चिठ्ठी लिहित मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं
More than 100 people poisoned after eating panipuri in Kamalgaon Weeks market
जळगाव : कमळगाव आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने १०० पेक्षा जास्त जणांना विषबाधा
Eknath Shinde Uddhav Thackeray
Maharashtra News Update: “वारसा सांगणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला तितांजली दिली”; एकनाथ शिंदेंची ठाकरे गटावर टीका!

दुष्काळी स्थितीमुळे या वर्षी ही स्थिती उद्भवली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पिण्याच्या पाण्यासाठी लाखो जणांना टँकरवर अवलंबून रहावे लागले. शेतीसाठी फारसे पाणी उपलब्ध नव्हते. ज्यांच्याकडे ते होते, त्यांना तीव्र उन्हात भाजीपाला उत्पादन जिकिरीचे ठरले. या सर्वाची परिणती पावसाळ्याच्या प्रारंभी भाजीपाला उत्पादनात लक्षणीय घट होण्यात झाली आहे.

आणखी वाचा-नाशिक शिक्षक मतदारसंघ! मविआच्या उमेदवाराला अजित पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्याचा पाठिंबा? वाढदिवसानिमित घेतलेली भेट चर्चेत!

जिल्ह्यात नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती ही भाजीपाल्याचे व्यवहार होणारी मुख्य घाऊक बाजारपेठ आहे. येथून मुंबईला दैनंदिन दीडशे ते दोनशे वाहने भाजीपाला पुरवठा करतात. फारशी आवक नसल्याने मुंबईला एरवी पाठविल्या जाणाऱ्या भाजीपाल्यात घट झाल्याचे साईधन व्हेजिटेबल कंपनीचे संचालक मोहन हिरे यांनी सांगितले. घाऊक बाजारात दर कमालीचे उंचावलेले असल्याने किरकोळ बाजारात येताना तो अधिक महाग होतो. सध्या सर्वच फळभाज्या व पालेभाज्या किमान ५० ते १०० रुपयांच्या घरात आहेत. भाजीपाला महाग असल्याने तो कमी प्रमाणात खरेदी केला जातो. किरकोळ बाजारात ज्या दरात आधी भाजीपाला मिळायचा, तोच दर सध्या घाऊक बाजारात असल्याचे दिसून येते.

घाऊक बाजारात कोथिंबिर ९० रुपये जुडी

सोमवारी बाजार समितीत १२३३ क्विंटल पालेभाज्यांची आवक झाली. हायब्रिड कोथिंबिरला ९० रुपये जुडी (१०० जुड्यांसाठी नऊ हजार) तर गावठी कोथिंबिरला ८० रुपये जुडी (१०० जुड्यासाठी आठ हजार) असा दर मिळाला. या दिवशी बाजार समितीत ३१२० मेथी जुड्यांची आवक झाली. त्यास ४० रुपये जुडी, शेपू ४२ रुपये जुडी आणि कांदा पातीला सरासरी ६५ रुपये जुडीला भाव मिळाला.

आणखी वाचा-नाशिक : भद्रकालीत जमावाच्या हल्ल्यात दोन जण जखमी

फळभाज्याही महाग

एरवी किरकोळ बाजारात ज्या दरात भाजीपाला मिळतो, तेवढाच दर सध्या घाऊक बाजारात आहे. टोमॅटो सरासरी ३० रुपये किलो, दोडका ८३ रुपये (प्रति क्विंटल ८३३० रुपये), कारले ७० रुपये, गिलके ४८ रुपये, भेंडी ४२ रुपये, गवार ४५ रुपये, टोमॅटो ३० रुपये, वांगी ४० रुपये, फ्लॉवर १५ रुपये, कोबी १४ रुपये, भोपळा १८ रुपये, काकडी ३२ रुपये किलो असे दर मिळत आहेत. किरकोळ बाजारात यात दुपटीने वाढ होत असल्याचे ग्राहक सांगतात. महागड्या भाजीपाल्याने घरातील आर्थिक समीकरण बिघडते.

एक, दीड महिन्यांपासून जिल्ह्यात प्रचंड ऊन होते. पाण्याचा अभाव आणि तापमान याची झळ भाजीपाला उत्पादनास बसली. त्यामुळे भाजीपाल्याची आवक ५० टक्क्यांनी घटली आहे. -देविदास पिंगळे (सभापती, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती)