नाशिक – इगतपुरी तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या खैरेवाडी येथे होणारा शासन आपल्या दारी हा उपक्रम काही तांत्रिक अडचणींमुळे चिंचले गावात घेण्यात आल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. पुढील आठवड्यात खैरेवाडी येथे शासन आपल्या दारी हा उपक्रम घेण्यात येईल, असे तहसीलदारांनी सांगितले.मंगळवारी इगतपुरी तालुक्यातील खैरेवाडी येथे शासन आपल्या दारी कार्यक्रम होणार असल्याचे सांगण्यात आले होते. तहसीलदार यांच्या आदेशाने खैरेवाडी येथे हा कार्यक्रम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. तसे निरोप देखील तलाठींमार्फत त्या वाडीच्या ग्रामस्थांना दिले गेल्याने मंगळवारी सर्व ग्रामस्थ घरीच थांबले. अधिकारी येतील म्हणून वाट पाहत बसले. परंतु, अधिकारी वाडीवर आलेच नाही. अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच ठिकाणी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू केला. त्यामुळे खैरेवाडी ग्रामस्थांनी बहिष्कार टाकला. एकही नागरिक त्याठिकाणी गेला नाही.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा