धुळे – जिल्ह्यातील अनेर आणि जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणातून विसर्ग करण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यात अनेर मध्यम प्रकल्प आहे. प्रकल्प परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे प्रकल्पात साठा वाढणार असल्याने धरणाचे १० दरवाजे एक मीटरने उघडून १५ हजार ८८० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक आणि विसर्गही वाढण्याची शक्यता असल्याने अनेर नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीकाठच्या रहिवाशांनी स्वसंरक्षणासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशी सूचना पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केली आहे.

Markandeshwar mountain, Devotees crowd,
नाशिक : मार्कंडेश्वर डोंगरावर बंदी झुगारुन भाविकांची गर्दी
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Narendra Modi Subhash Desai
Narendra Modi : “मला ८४ हजारांची पेन्शन मिळते, मोदींना किती रुपये मिळतील माहितीय का?”, सुभाष देसाईंनी सगळी आकडेवारी मांडली
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue
Nitin Gadkari on Shivaji Maharaj Statue: ‘… तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला नसता’, नितीन गडकरींनी दाखवली ‘ती’ चूक
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana Scam : ३० आधार कार्ड, ३० अर्ज अन् एक मोबाईल क्रमांक; लाडकी बहीण योजनेतील धक्कादायक गैरप्रकार उघड

हेही वाचा – नंदुरबार तालुक्यात दोन भावांचा बुडून मृत्यू

हेही वाचा – ५० कोटींच्या कर्जांसाठी लाखोंचा खर्च, प्रदीर्घ काळापासून एकच लेखा परीक्षक – मविप्र वार्षिक सभेत गोंधळ

दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाच्या पाणी पातळीतही वाढ झाल्याने सोमवारी सकाळी ११ वाजता धरणाचे १८ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आल्याने ९८ हजार ६७० क्यूसेक वेगाने तापी नदीपात्रात विसर्ग होत आहे. स्थानिक नाल्यांद्वारेही पाणी तापी नदीपात्रात येत असल्याने पात्रात आवक वाढण्याची शक्यता असल्यामुळे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सुलवाडे बॅरेजमधूनही विसर्ग करण्यात येणार आहे. यामुळे तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नयेत, नदीपात्रामध्ये जाऊ नये, नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षितस्थळी हलविण्यात यावेत, असा इशारा साक्री पाटबंधारे उपविभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे.