लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या आदेशाची अंमबजावणी करण्याचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा प्रशासन २४ तासात पाणी सोडणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि बेकायदेशीर पाणी उपसा होणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना प्रशासनाने पाटबंधारे विभाग व पोलीस यंत्रणेला केली आहे.

Prakash Abitkar
खासगी रुग्णालयांना दिलासा देणारं आरोग्यमंत्र्यांनी उचललं पाऊल
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Mahabhishek of Sunrays to Dagdusheth Halwai Ganapati Pune print news
नेमके काय घडले शनिवारी सकाळी सव्वाआठ वाजता; श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा महाभिषेक 
rte admission process loksatta news
‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमामुळे ‘आरटीई’ प्रवेश सोडतीच्या वेळेत बदल
Ajit Pawar announcement for village after Guillain Barre Syndrome outbreak
पुण्यातील ‘जीबीएस’च्या उद्रेकानंतर अजित पवारांची समाविष्ट गावांसाठी मोठी घोषणा
cet Chamber extends bed med application deadline students can apply until February 18 2025
बीएड, एमएड अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला मुदतवाढ, १८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार
12-year-old girl diagnosed with Guillain-Barre syndrome
‘जीबीएस’ची चंद्रपूर जिल्ह्यात धडक, १२ वर्षीय मुलीला लागण; आरोग्य यंत्रणेकडून लपवाछपवी
thane Due to maintenance work in Jambhul water treatment plant water supply shut for 24 hours
शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, जांभूळ जलशुध्दीकरण केंद्रात दुरुस्तीचे काम

दुष्काळी वर्षात पाण्यावरून नाशिक, नगर आणि मराठवाड्यात पुन्हा एकदा संघर्ष झाला. समन्यायी पाणी वाटप तत्वाच्या आधारे गंगापूर समुहातून ५०० दशलक्ष घनफूट, दारणा समुहातून २६४३ दशलक्ष घनफूट, मुळा समुहातून २१००, प्रवरा समुहातन ३३६० असे नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून एकूण ८६०३ दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीसाठी सोडण्यात येणार आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने पाणी सोडण्याचे आदेश दिले असले तरी सुमारे चार आठवडे त्याची अमलबजावणी झाली नाही.

आणखी वाचा-नाशिक : शहर पोलीस आयुक्तपदी संदिप कर्णिक

या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल आहेत. सर्वोच्च न्यायालयाने महामंडळाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार दिला होता. पाणी सोडले जात नसल्याने मराठवाड्यातील कार्यकर्त्यांनी गंगापूर धरणावर धडक देत आंदोलन केले होते. पाणी सोडण्यास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी शुक्रवारी सायंकाळी तातडीने बैठक घेतली. दारणा धरणातून २४ तासात पाणी सोडण्यात येईल. गंगापूरमधील पाणी सोडण्यास काही अवधी लागणार आहे.

पाण्याच्या विसर्ग मार्गात पाणी चोरी होऊ नये म्हणून दारणा व गोदावरी काठावरील वीज पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. आंदोलन वा अन्य कारणास्तव विसर्गात अडथळे येऊ नये म्हणून पोलीस यंत्रणा खबरदारी घेणार आहे.

Story img Loader