नाशिक: जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडीठाक झाली असून धरणसाठा आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मान्सूनचे आगमन झाले असले तरी जलसाठ्या भर पडण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे. जूनच्या पूर्वार्धात आळंदी, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, केळझर, पुनद, माणिकपूंज ही १२ धरणे जवळपास कोरडीठाक झाली आहेत. याशिवाय वाघाड, दारणा, मुकणे, चणकापूर ही धरणेही तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. त्यामध्ये तीन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान जलसाठा आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच हजार ४५९ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे.

गतवर्षी हे प्रमाण १६ हजार ६८९ (२५ टक्के) म्हणजे जवळपास तिप्पट होते. काश्यपी धरणात (२३ टक्के), गौतमी गोदावरी (१०), पालखेड (२२), हरणबारी (सात), गिरणा (१२), कडवा (सात टक्के) इतकाच जलसाठा आहे. मान्सूनचे नुकतेच नाशिकमध्ये आगमन झाले. परंतु, मुसळधार स्वरुपात तो कोसळलेला नाही. सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाल्याशिवाय धरणांची पातळी उंचावणार नाही. पावसाने दडी मारल्यास गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते. मागील काही वर्षात जूनमध्ये दाखल होणारा पाऊस नंतर काही दिवस अंतर्धान पावल्याची उदाहरणे आहेत. यंदा धरणांची स्थिती नाजूक असून पाणी टंचाईची झळ सर्वत्र जाणवत आहे. ती कमी होण्यासाठी मुसळधार पावसाची सर्वांना प्रतिक्षा आहे.

Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
What Bachchu Kadu Said?
बच्चू कडूंनी सांगितलं नवनीत राणांच्या पराभवाचं कारण, म्हणाले, “त्यांनी जर..”
sharad pawar
शरद पवार शाकाहारी की मांसाहारी? जैन मुनींच्या प्रश्नाला उत्तर देत म्हणाले, “मी गेल्या एक वर्षापासून…”
Manoj Jarange patil
“ओबीसी नेते नालायक असूनही…”, मनोज जरांगेंचा हल्लाबोल; मराठा तरुणांना आवाहन करत म्हणाले…
Nashik-Mumbai march of ashram school employees for salary increase
मानधन वाढीसाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा नाशिक-मुंबई मोर्चा
What Mohan Bhagwat Said About Manipur?
मोहन भागवत यांचा सरकारला सल्ला, “वर्षभरापासून मणिपूर जळतं आहे, त्याकडे…”
ajit pawar suresh dhas
“…अन् मी कपाळावर हात मारला”, अजित पवारांनी सांगितला आमदार सुरेश धस यांच्या दुसऱ्या लग्नाचा किस्सा

हेही वाचा : एकलहरे उपकेंद्रातील तीन रोहित्रांत बिघाड, नाशिकरोड परिसर अंधारात

गंगापूरमध्ये २० टक्के पाणी

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ११५४ दशलक्ष घनफूट म्हणजे २० टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात ३७ टक्के म्हणजे २०९६ दशलक्ष घनफूट जलसाठा होता. जानेवारीत महापालिकेने शहरात पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पातळीवर हा निर्णय टाळला गेला. त्यामुळे मुसळधार पाऊस न झाल्यास शहरावर कपातीची टांगती तलवार लटकण्याची भीती व्यक्त केली जाते.