नाशिक: जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जिल्ह्यातील बहुतांश धरणे कोरडीठाक झाली असून धरणसाठा आठ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. मान्सूनचे आगमन झाले असले तरी जलसाठ्या भर पडण्यासाठी मुसळधार पावसाची गरज आहे. जूनच्या पूर्वार्धात आळंदी, करंजवण, ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, केळझर, पुनद, माणिकपूंज ही १२ धरणे जवळपास कोरडीठाक झाली आहेत. याशिवाय वाघाड, दारणा, मुकणे, चणकापूर ही धरणेही तळ गाठण्याच्या स्थितीत आहेत. त्यामध्ये तीन ते पाच टक्क्यांच्या दरम्यान जलसाठा आहे. सध्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पाच हजार ४५९ दशलक्ष घनफूट जलसाठा आहे.

गतवर्षी हे प्रमाण १६ हजार ६८९ (२५ टक्के) म्हणजे जवळपास तिप्पट होते. काश्यपी धरणात (२३ टक्के), गौतमी गोदावरी (१०), पालखेड (२२), हरणबारी (सात), गिरणा (१२), कडवा (सात टक्के) इतकाच जलसाठा आहे. मान्सूनचे नुकतेच नाशिकमध्ये आगमन झाले. परंतु, मुसळधार स्वरुपात तो कोसळलेला नाही. सलग काही दिवस मुसळधार पाऊस झाल्याशिवाय धरणांची पातळी उंचावणार नाही. पावसाने दडी मारल्यास गंभीर स्थितीला तोंड द्यावे लागू शकते. मागील काही वर्षात जूनमध्ये दाखल होणारा पाऊस नंतर काही दिवस अंतर्धान पावल्याची उदाहरणे आहेत. यंदा धरणांची स्थिती नाजूक असून पाणी टंचाईची झळ सर्वत्र जाणवत आहे. ती कमी होण्यासाठी मुसळधार पावसाची सर्वांना प्रतिक्षा आहे.

Radhakrishna Vikhe criticize Municipal Corporation on issue of water usage and recycling
जलसंपदामंत्र्यांच्या नाशिक महापालिकेला कानपिचक्या; पाणी वापर, पुनर्वापराचा मुद्दा
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Will study decision to increase height of Almatti says Radhakrishna Vikhe
अलमट्टीची उंची वाढविण्याच्या निर्णयाचा अभ्यास करणार – राधाकृष्ण विखे यांचे प्रतिपादन
BSE Smallcap News
BSE Smallcap ची १००० अंकांची गटांगळी; ४ महत्त्वाचे घटक जाणून घ्या!
Maharashtra temperature rise news in marathi
राज्यात उन्हाच्या झळा वाढल्या, पुढील २४ तासात असे असेल तापमान
What is the water storage in the Khadwasla dam chain Pune news
खडवासला धरण साखळीत पाणीसाठा किती? पुण्याचा पाणीपुरवठा सुरळीत राहणार?
nashik jaljeevan mission aims to provide 55 liters of clean water daily
पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यातच ‘जलजीवन मिशन’ संकटात, चार वर्षात केवळ २९४ योजना पूर्ण
592 crores assistance to those affected by natural disasters
नैसर्गिक आपत्ती बाधितांना ५९२ कोटींची मदत, राज्यातील ५.४० लाख शेतकऱ्यांना दिलासा

हेही वाचा : एकलहरे उपकेंद्रातील तीन रोहित्रांत बिघाड, नाशिकरोड परिसर अंधारात

गंगापूरमध्ये २० टक्के पाणी

नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूरमध्ये ११५४ दशलक्ष घनफूट म्हणजे २० टक्के जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात ३७ टक्के म्हणजे २०९६ दशलक्ष घनफूट जलसाठा होता. जानेवारीत महापालिकेने शहरात पाणी कपातीचा प्रस्ताव तयार केला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पातळीवर हा निर्णय टाळला गेला. त्यामुळे मुसळधार पाऊस न झाल्यास शहरावर कपातीची टांगती तलवार लटकण्याची भीती व्यक्त केली जाते.

Story img Loader