लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : शहरातील लवाटेनगर येथील जलकुंभातील वितरण प्रणालीतील दोषामुळे संभाजी चौकातील रहिवाश्यांना चार ते पाच दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाकडून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे वारंवार सांगितले गेले. परंतु, अद्याप अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही. काही ठिकाणी अतिशय कमी दाबाने पाणी आले. पाण्याचे टँकरही उपलब्ध झाले नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली. पाणी पुरवठा सुरळीत होईल, असा दावा मनपा अधिकाऱ्यांनी केला आहे.

On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
nashik gas leakage latest news in marathi
नाशिक : पवननगरमध्ये जेसीबीच्या धक्क्याने गॅस गळती
khadakwasla water, khadakwasla ,
‘खडकवासल्या’तील पाणी पिण्यास अयोग्य! राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या तपासणीतील निष्कर्ष
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
nashik city water cut on Saturday due to technical work by authorities
नाशिकमध्ये शनिवारी पाणी पुरवठा बंद
pune Municipal Corporation, water ,
‘त्या’ गावातील ११ सोसायट्यांना टँकरने पाणी, काय आहे कारण ?
Health Minister prakash Abitkar Guillain Barre Syndrome Pune contaminated well water Sinhagad road
सिंहगड रस्ता परिसरातील विहिरीतील दूषित पाण्यामुळेच पुण्यात जीबीएस; आरोग्यमंत्री आबिटकर यांची कबुली

संभाजी चौक परिसरात काही दिवसांपासून पाणी पुरवठ्यात स्थानिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. लवाटेनगर येथील जलकुंभातून या परिसरात पाणी पुरवठा होतो. व्हॉल्व्हमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे पाणी पुरवठा विस्कळीत झाला. परिणामी, चार ते पाच दिवसांपासून पाणी पुरवठा होत नसल्याची तक्रार मॅग्मोप्रकाश कॉलनीतील रहिवासी अंजली बुटले यांनी केली. यासारखी समस्या प्रेस्टिज पार्क व आसपासच्या रहिवाशांना भेडसावत आहे.

आणखी वाचा-निर्यातबंदी उठविण्याची तयारी अन् नाशिक जिल्ह्यात कांद्याची उसळी

या संदर्भात स्थानिकांनी मनपाच्या पाणी पुरवठा विभागाकडे तक्रारीही केल्या. आज सुरळीत होईल, उद्या सुरळीत होईल अशी उत्तरे दिली गेली. परंतु, रविवारपर्यंत सुधारणा झाली नाही. ज्यांच्याकडे दोन नळ जोडण्या आहेत, त्यांच्याकडे कमी दाबाने पाणी आले. उर्वरित रहिवाश्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागली. शनिवार व रविवार शासकीय सुट्टी होती. त्यामुळे पाण्याचे टँकर देखील उपलब्ध झाले नसल्याचे बुटले यांच्यासह अन्य नागरिकांनी सांगितले.

या संदर्भात पश्चिम विभागाचे विभागीय अधिकारी योगेश रकटे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या भागातील व्हॉल्व्हमध्ये काही तांत्रिक दोष निर्माण झाल्याचे नमूद केले. दुरुस्ती झाली असून लवकरच उपरोक्त भागात पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Story img Loader