लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : भुजबळ कुटूंबियांनी भीतीचे वातावरण कधीही निर्माण केले नाही. आम्ही लोकांच्या जमिनी लाटत नाहीत. खोटी प्रकरणे टाकून कुणाला कारागृहात पाठवत नाहीत. दबावतंत्राचा उपयोग करीत नाहीत. असे सांगत अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार सुहास कांदे यांच्यावर टिकास्त्र सोडले.

Maharashtra State Government approves interest subsidy for sugar mills print politics news
मातब्बर विरोधक सरकारचे ‘लाभार्थी’; जयंत पाटील, थोरात, देशमुख, कदम यांच्या कारखान्यांना व्याज अनुदान
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Ratan Tata Relations with politicians
Ratan Tata: नरेंद्र मोदी ते मोहन भागवत; सर्वपक्षीय पुढाऱ्यांशी संबंध असूनही रतन टाटा राजकारणापासून अलिप्त कसे राहिले?
eknath shinde
Ratan Tata Death : “नैतिकता जपत उद्योगाबरोबरच देश अन् समाजाचा विकास करण्याची विचारधारा…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रतन टाटांना वाहिली श्रद्धांजली!
Demand is rising for art center and hospital on wasteland at Kopri Anandnagar
आनंद नगर, मुलुंड कचराभूमीवर कलाकेंद्र आणि रुग्णालय बनवा, मुलुंड ठाण्याच्या वेशीवरील रहिवाशांचे स्वाक्षरी अभियान
aditya thackeray devendra fadnavis
“…तर इगो कुणाचा दुखावतोय, हे कळेल”; देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ आरोपाला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर!
BJP leader Ashish Deshmukh alleged that Anil Deshmukh is trying to take credit for Ladki Bahin Yojana
‘लाडकी बहीण’ योजनेवरून भाजपचे आशीष देशमुख यांचा अनिल देशमुखावर आरोप..
Rohit pawar on Tanaji Sawant
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!

इगतपुरी मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हिरामण खोसकर यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शुक्रवारी भुजबळ हे जिल्हाधिकारी कार्यालयात आले असता त्यांनी सुहास कांदे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. काही वर्षांपूर्वी नाशिक हे भुजबळांमुळे दहशतीखाली वावरत होते, समीर भुजबळ यांनी मोठे गुंड पाळले होते, त्यामुळे नाशिककरांनी त्यांना तडीपार केल्याचा आरोप कांदे यांनी केला होता. कांदेंच्या आरोपांना समीर हे उत्तर देतील. न्यायालयाकडून आम्हाला कुठलीही नोटीस आलेली नाही. उलट महायुतीत एकत्र असतानाही वारंवार अपिलात जाऊन कांदे हे विरोधात काम करतात, हे त्यांनी स्वत: एकप्रकारे कबूल केल्याकडे छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले. नांदगावमध्ये भीतीचे वातावरण आहे. न्यायालयातील अपिल मागे घेण्यासाठी पैशांचे अमिष दाखविल्याचा आरोप भुजबळांनी खोडला. कांदे हे कायम विमान प्रवास करतात. त्यांच्याकडे आमच्यापेक्षा जास्त पैसा आहे. आम्ही काय त्यांना अमिष दाखविणार, असा चिमटा भुजबळ यांनी काढला.

आणखी वाचा- दिवाळीसाठी नाशिक विभागाकडून जादा बससेवा

महायुती आणि महाविकास आघाडीकडून जिल्ह्यातील काही जागांवर उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. याबद्दलही भुजबळ यांनी मत व्यक्त केले. जिथे इच्छुकांची संख्या अधिक असते, तिथे बंडखोरीची शक्यता असते. तिथे बंडखोरी होऊ नये म्हणून उशिराने नावे जाहीर केली जात असल्याचे नमूद केले. शरद पवार यांच्या इतका राज्यातील मतदारसंघ आणि उमेदवारांचा कदाचितच कुणाचा अभ्यास असेल, त्यामुळे त्यांच्या पक्षाकडून बंडखोरी रोखण्यासाठी सावकाश निर्णय होईल. निफाडच्या जागेबाबत लवकर निर्णय होईल. या ठिकाणी केल्या जाणाऱ्या सर्वेक्षणाच्या प्रश्नावर त्यांनी सर्व राजकीय पक्ष असे सर्वेक्षण करीत असल्याचे नमूद केले. जिथे पक्षाला खात्री असते तिथेही सर्वेक्षण होते. समोरील उमेदवार कोण, त्याच्यासमोर कोण प्रभावी लढत देईल, यासाठी वारंवार सर्वेक्षण होतात. असे भुजबळ यांनी सांगितले.