अनिकेत साठे, लोकसत्ता

नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या संकल्पनेतून गोदावरी गौरवची मुहूर्तमेढ रोवली गेली. वेगवेगळ्या क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या बड्या व्यक्तींचा गौरव करायला हवा, यानिमित्ताने संबंधित व्यक्ती नाशिक नगरीत यावी आणि नाशिककरांनी त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा, या कल्पनेतून सुरू झालेल्या गोदावरी गौरव पुरस्काराने आजवर अनेकांना गौरविण्यात आले आहे. एका वर्षी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांची निवड करण्यात आली. परंतु, पुरस्कार स्वीकारण्यास त्यांना प्रत्यक्ष नाशिकला येणे शक्य नव्हते. त्यामुळे पुढील वेळी म्हणजे दोन वर्षानंतर त्यांना गौरविण्यात आले. पहिल्यांदा निवड झाली, तेव्हाच डॉ. माशेलकरांनी दोन वर्षापुढील पुरस्कार वितरणाची तारीख आपल्या वहीत नोंदवून घेतली होती.

Jai Pawar, Yugendra Pawar, Kanheri,
कन्हेरीत कुस्ती आखाड्यात युवा नेते जय पवार आणि युगेंद्र पवार समोरासमोर
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
rape, Vasai, School Rape Vasai, Yadvesh vikas shala rape,
Vasai Crime News : यादवेश विकास शाळेतील बलात्कार प्रकरण, मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकावर गुन्हा दाखल
Joe Biden praise on kamala harris
कमला हॅरिस इतिहास घडवतील! बायडेन यांच्याकडून विश्वास व्यक्त; लोकशाहीसाठी मतदान करण्याचे आवाहन
Rape girl Ambernath, Rape of girl,
वडिलांच्या मित्राकडून अल्पवयीन तरुणीवर बलात्कार, ७५ वर्षीय आरोपी अटकेत, अंबरनाथमध्ये संताप
Kolkata Doctor Rape and Murder
Kolkata Doctor Rape and Murder : “कोलकाता पीडितेला न्याय द्या!” पद्म पुरस्कार विजेत्या ७० डॉक्टरांचं पंतप्रधान मोदींना पत्र
BJP, Chitra Wagh, criminal public interest litigation, Chief Minister, Eknath Shinde, Sanjay Rathod Pune, TikTok, young woman's death, defamation,
मदत नको, पण कुटुंबीयांची बदनामी थांबवा, संजय राठोड प्रकरणात मृत तरुणीच्या वडिलांची न्यायालयात मागणी
Mamata Banerjee role in doctor rape murder case Protests continue at hospitals
…तर सीबीआय तपासासाठी तयार! डॉक्टर बलात्कार, हत्याप्रकरणी ममता बॅनर्जींची भूमिका; रुग्णालयांमध्ये निदर्शने सुरूच

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या गोदावरी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲड. विलास लोणारी यांनी ही आठवण कथन केली. प्रतिष्ठानतर्फे १९९२ पासून दर दोन वर्षांनी गोदावरी गौरव पुरस्कार दिले जातात. यंदाचा हा १७ वा पुरस्कार आहे. कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी त्याचे वितरण केले जाते. पुरस्कार्थींची निवड प्रतिष्ठानचे विश्वस्त मंडळ करते. ज्या कुणाचा या पुरस्काराने गौरव केला जाणार आहे, त्या व्यक्तीने स्वत: उपस्थित राहावयास हवे, ही अट आहे. या अटीमुळे डॉ. माशेलकर यांना दोन वर्ष प्रतिक्षा करावी लागली. या पुरस्कारामागील तात्यासाहेब तथा वि. वा. शिरवाडकर यांची भावना ॲड. लोणारी यांनी नमूद केली. केवळ साहित्यच नव्हे तर, वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याचा विचार झाला. हा पुरस्कार नसून संबंधित व्यक्तीने केलेल्या कामाचा गौरव करणे अनुस्युत आहे. मोठी कामे करणारी माणसे नाशिकला यायला हवीत आणि शहरातील लोकांनी त्यांना कृतज्ञतेचा नमस्कार करावा, या भावनेतून सुरू झालेल्या गोदावरी गौरवच्या निवड प्रक्रियेत पुरस्कार्थींची प्रत्यक्ष उपस्थिती ही अट प्रारंभापासून ठेवली गेली.

आणखी वाचा-कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे गोदावरी गौरव पुरस्कार जाहीर; आशुतोष गोवारीकर, विवेक सावंत, प्रमोद कांबळे यांसह सहा जणांचा समावेश

एकदा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांचा गौरव करण्याचे निश्चित झाले. त्या अनुषंगाने प्रतिष्ठानने त्यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा डॉ. माशेलकर यांची १० मार्च रोजीची स्वित्झर्लंड येथील आंतरराष्ट्रीय बैठक आधीच निश्चित झाली होती. त्यांनी दिल्लीत येऊन पुरस्कार वितरण करण्यास सुचवले. परंतु, प्रतिष्ठानकडून गोदावरी गौरवसाठी प्रत्यक्ष नाशिक येथे उपस्थित राहण्याचा नियम सांगितला गेला. यावर डॉ. माशेलकर यांनी पुढील वेळी हा पुरस्कार द्यावा, त्या सोहळ्याची तारीख आजच लिहून ठेवतो, असे म्हटले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल २००४ मध्ये डॉ. रघुनाथ माशेलकर यांना गौरविण्यात आले. कुसुमाग्रजांच्या संस्थेत गौरव होतो ही बाब सर्वांसाठी आनंदाची असते, याकडे ॲड. लोणारी यांनी लक्ष वेधले. गोदावरी गौरवने आजवर वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले आहे. या गौरवासाठी भाषा. प्रांत, विषय वा क्षेत्राची मर्यादा ठेवली गेली नाही. याचे दाखले यावेळी देण्यात आले.

पुरस्कार रकमेत वाढ अशक्य

प्रारंभी गोदावरी गौरव पुरस्कारासाठी ११ हजार रुपये रक्कम होती. लोकांच्या मागणीनुसार ती २१ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. या सोहळ्याचा एकूण खर्च सात लाखांच्या आसपास आहे. पुरस्कार्थींची निवास, येणे-जाणे व्यवस्था आदींसाठी बराच खर्च होतो. त्यामुळे ही रक्कम वाढविणे अशक्य असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पुरस्कार्थींचे काम खूप मोठे आहे. पुरस्काराची रक्कम हे केवळ एक टोकन असल्याचे सूचित करण्यात आले.