लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक: शेतातील घरात मांडणीतून भांडे काढत असतांना साप चावल्याने ३० वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
शिरसगावजवळील नांदुरकी पाडा येथील भीमाबाई बुधर या पापडाची माळी शेतातील घरात काम करत होत्या. मांडणीतून भांडी काढत असतांना हाताच्या बोटास साप चावला. त्यांना तातडीने शिरसगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर हरसूल ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.