नाशिक शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे महात्मा गांधी रस्त्यावरील पक्ष कार्यालय ते बडी दर्गा अशी यात्रा जिल्हाध्यक्ष स्वप्निल पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली काढण्यात येवून “रोजगार दो, न्याय दो” अशी मागणी करण्यात आली.

यावेळी अखिल भारतीय युवक काँग्रेसचे सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी एहसान खान, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲड. आकाश छाजेड, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, प्रदेश सचिव डॉ. हेमलता पाटील आदी उपस्थित होते. रोजगाराचे खोटे आश्वासन, वाढती महागाई, भरती प्रक्रियेत घोटाळा, या मुद्द्यांकडे युवक काँग्रेसने यात्रेव्दारे लक्ष वेधले. अराजकीय लोकांचा, युवावर्गाचा प्रत्यक्ष सहभाग आगामी काळात या यात्रेत करून राज्यात, जिल्ह्यात परिवर्तन घडविणार असल्याचे युवक काँग्रेस अध्यक्ष स्वप्निल पाटील यांनी सांगितले.

Nirmala Gavit on way to back to congress insisting on candidacy from Igatpuri
निर्मला गावित स्वगृही परतण्याच्या मार्गावर, इगतपुरीतून उमेदवारीसाठी आग्रही
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Loksatta anvyarth Baba Siddiqui shot and killed Law and order
अन्वयार्थ: कायदा आणि कुव्यवस्था?
Ajit Pawar Jansanman Yatra Amravati,
अजित पवारांची अमरावतीतील जनसन्‍मान यात्रा रद्द
ratnagiri bjp workers not to work for shiv sena candidates
रत्नागिरी विधानसभेसाठी शिवसेनाच्या उमेदवारांचे काम न करण्याचा भाजपा कार्यकर्त्यांचा बैठकीत निर्णय, पक्ष बदलण्याचा निर्णय
Narendra Modi temple Pune, BJP party worker temple pune,
पुण्यात मोदींचे मंदिर उभारणाऱ्या कार्यकर्त्याचा भाजपला ‘रामराम’
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Black Flags Shown to Uday Samant At Ratnagiri
Ratnagiri : रत्नागिरीत वक्फ बोर्डाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी राडा, उदय सामंतांना भाजपा कार्यकर्त्यांनी दाखवले काळे झेंडे

हेही वाचा…धुळ्यात लाचखोर पोलीस उपनिरीक्षकासह हवालदार जाळ्यात

काँग्रेस सेवादलतर्फे आज मूक सत्याग्रह

नाशिक शहर काँग्रेस सेवादलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रामकुंड येथील गांधी ज्योतसमोर मूक सत्याग्रह आंदोलन शुक्रवारी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी संपूर्ण जगाला व देशाला देशहिताचा, अहिंसेचा व मानवतेचा संदेश दिला असताना जाणीवपूर्वक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम विशिष्ट संघटना करत आहेत. याविरोधात हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक शहर काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष वसंत ठाकूर यांनी केले