नवी मुंबई: नवी मुंबई आणि परिसर ही तिसरी नवी मुंबई समजली जात असून देशाच्या ६५ टक्के डेटा सेंटर क्षमता ही नवी मुंबईत असल्याने हे शहर डेटा सेंटर हब बनत आहे. नवी मुंबईत महिला सुरक्षा प्रकल्पाचे उद्घाटक म्हणून आलेल्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. या वेळी त्यांनी राज्यात महिला सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. 

नवी मुंबईतील नेरुळ येथील सावली इमारतीत महिला सुरक्षा प्रकल्प उभा करण्यात आला असून याच इमारतीत सायबर पोलीस ठाण्याचे उद्घाटन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. विमानतळ व ट्रान्स हार्बर मार्ग झाल्यानंतर नवी मुंबई परिसरात मोठी गुंतवणूक वाढणार आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचेही महत्त्व वाढणार असल्याने पोलिसांनी आव्हानांना सामोरे जाण्यासाठी अद्ययावत होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. आज मितीस मुंबई हे सर्वात सुरक्षित शहर असून कुठेही, कधीही महिला एकट्या फिरू शकतात.

eco friendly development in navi mumbai city green building projects in navi mumbai
 नवी मुंबईत पर्यावरणप्रिय हरित बांधकांना चालना; ‘सीआयआय-आयजीबीसी’च्या ३० व्या केंद्राचे कार्यान्वयन
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
maharashtra govt gave responsibility to ias officers for developing mmr as a growth hub
‘एमएमआर’च्या विकासाची जबाबदारी नोकरशहांकडे! राजकीय हस्तक्षेप टाळण्यासाठी केंद्राची सूचना अमलात
Rent Cheque Distribution by cm To Eligible Slum Dwellers Of Mata Ramabai Ambedkar Nagar
झोपडपट्टीमुक्त मुंबई हेच आमचे स्वप्न : मुख्यमंत्री, रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास अंतर्गत रहिवाशांना धनादेशाचे वाटप
Plot to Mumbai Bank despite violation of MHADA Act Mumbai news
म्हाडा कायद्याचे उल्लंघन करून ‘मुंबै बँके’ला भूखंड! प्रतीक्षानगर येथील जागेचे थेट वितरण
BMC launched rabies free Mumbai initiative in Mumbai
मुंबई : महापालिकेचा ‘रेबीजमुक्त मुंबई’ संकल्प, २८ सप्टेंबरपासून लसीकरण मोहीम
Raigad is engine of economic development in country after Mumbai due to IT industry says Devendra Fadnavis
आयटी उद्योगामुळे मुंबईनंतर रायगड हे देशातील आर्थिक विकासाचे इंजिन बनत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Devendra fadnavis latest marathi news
‘झोपु’ योजनांमुळे केंद्र सरकारची शेकडो एकर जमीन लवकरच खुली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वपूर्ण घोषणा; नव्या गृहनिर्माण धोरणाचे संकेत

हेही वाचा… नवी मुंबईत दोन ठिकाणी बहुमजली पार्किंग सुविधा उपलब्ध होणार

महिलांवरील बलात्कार प्रकरणांत ९० टक्के हे नातेवाईक वा परिचित व्यक्तीच आरोपी असतात, मात्र अब्रू जाईल या भीतीने ही प्रकरणे घरातच दाबली जातात. दिल्लीत घडलेल्या दुर्दैवी निर्भया प्रकरणानंतर महिला धाडस करीत आरोपीविरोधात गुन्हा नोंदवत आहेत. तक्रारदार महिला पुढे येऊ लागल्याने गुन्ह्यांची संख्या वाढत असली तरीही गुन्हेगारांवर जरब बसवण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचेही ते म्हणाले. एका युनिटपुरते मर्यादित असलेले सायबर युनिट; आता सायबर पोलीस ठाणी सुरू करावी लागली. हे पोलिसांपुढे आव्हान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तर पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी महिला सुरक्षेसाठी महाराष्ट्र पोलीस कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्याच उद्देशाने निर्भया पथक ही संकल्पना राबवली जात असल्याचेही ते म्हणाले.

हेही वाचा… नेरुळमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ लाखांचा सिंहासनारूढ पुतळा उभारणार; ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचीही मिळाली परवानगी 

सिनेदिग्दर्शक रोहित शेट्टी यांनीदेखील नवी मुंबई पोलिसांच्या महिला सुरक्षेच्या उपक्रमांचे कौतुक केले. तसेच या प्रकल्पाची माहिती देताना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी सांगितले, सदर पथकात १० आर्टिगा, ४० दुचाकी असून अजून १० आर्टिगा घेण्यात येणार आहेत. महाविद्यालय परिसरात गस्त, महिला ज्या ज्या भागात स्वतःला असुरक्षित समजतात त्या ठिकाणी गस्त वाढवणे, असे उपाय केले जाणार आहेत.

हेही वाचा… नवी मुंबई परिवहन सेवेच्या बस चालक, वाहकाला मारहाण

नवी मुंबईत ११२ क्रमांकाचा प्रतिसाद (रिस्पॉन्स) सरासरी सव्वापाच मिनिटे असून त्यात अजून सुधारणा करण्याचा प्रयत्न करीत आहोत. तसेच सर्व पोलीस ठाण्यांत महिला कक्ष स्थापन केला आहे. या प्रसंगी आमदार गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, पोलीस सह आयुक्त संजय मोहिते, नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर आणि पनवेल मनपा आयुक्त देशमुख आदी उपस्थित होते.

सावली महिला सुरक्षा केंद्र इमारतीत तळमजल्यावर स्वागत कक्ष आणि समुपदेशन केंद्र आहे तर पहिल्या माळ्यावर सायबर पोलीस ठाणे असून तेथेही सायबर गुन्ह्यासंबंधी महिलासाठी समुपदेशन केंद्र आहे. याशिवाय दुसऱ्या माळ्यावर महिला आश्रय केंद्र आहे. येथे अचानक बेघर झालेल्या महिलांना राहण्याचीही सोय करण्यात आली आहे. या केंद्रासाठी निर्माता- दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मदतीतून गाड्या दिल्या गेल्याचे आयुक्त भांबरे यांनी सांगितले.