पनवेल : कळंबोली परिसरामधील ३५ हजार वीज ग्राहकांपैकी ८ हजार वीजग्राहकांना शनिवारी सकाळपासून ते सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत विजेविना राहावे लागले. जेसीबीचे काम सूरु असताना विज वाहिनी तुटल्याने दिवसभर विज गायब होती. सकाळपासून सायंकाळपर्यंत विजवाहिनीचे दुरुस्तीचे काम सूरु असल्याने निम्या कळंबोलीकरांना विजेविना रहावे लागले.

पनवेल महापालिकेचे कळंबोलीत अमर रुग्णालय ते रोडपाली विसर्जन तलाव या रस्त्याचे काँक्रीटकरणाचे काम सूरु आहे. हे काम सूरु असताना शनिवारी सकाळी पावसाळी नाल्यातून महावितरण कंपनीने टाकलेल्या वीजवाहिनीला जेसीबीचा धक्का लागल्याने दोन ठिकाणी विजवाहिनी तुटली. कोणतीही जीवित हाणी झाली नाही.

rain Mumbai , Mumbai rain news, Mumbai latest news,
मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
metro services
‘मेट्रो ३’ विस्कळीत, दोन दिवसांतच तांत्रिक अडचणी
heavy vehicles ban on mangaon to dighi highway order by raigad collector
अलिबाग: माणगाव ते दिघी महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिसुचना जारी
temperature in Mumbai, Mumbai heat,
मुंबई : उन्हाच्या झळा वाढणार
Extra bus service for Saptshrung Fort in navratri 2024
नाशिक : सप्तश्रृंग गडासाठी जादा बससेवा
cyclonic air condition developed over North Maharashtra forming low pressure belt to North Bangladesh
पुण्यात बुधवारी पडलेल्या पावसाने २१ सप्टेंबर १९३८ रोजीचा विक्रम मोडला; जाणून घ्या, सप्टेंबर महिन्यांतील आजवरच्या पावसाची आकडेवारी
nagpur ambazari lake overflowed flood situation completes one year
नागपूरच्या महापुराची वर्षपूर्ती! भय इथले संपत नाही…

हेही वाचा…उरण: खोपटे-कोप्रोली मार्गावर खड्ड्यांचे विघ्न कायम, एकाच ठिकाणी खड्डे कसे? प्रवाशांचा सवाल; कोट्यवधी रुपये खर्च करूनही दुरवस्था

मात्र या वीजवाहिनीवर ८ हजाराहून अधिक वीज ग्राहक असल्याने सर्व ग्राहकांना विजेविना रहावे लागले. पनवेल महापालिकेच्या कंत्राटदाराच्या जेसीबी ऑपरेटरच्या चुकीमुळे हा अपघात झाला असल्याने सायंकाळी पावणेसहा वाजेपर्यंत वीजवाहिनीला जोड मारण्याचे काम सुरु होते. वीज नसल्याचा सर्वात मोठा फटका उन्हाळ्यात वीज ग्राहकांना सहन करावा लागला. पालिकेचे वीज विभाग दुरुस्तीचे काम करत होते. मात्र नेमकी किती वाजेपर्यंत वीज परत येईल याचे उत्तर वीज महावितरण कंपनी आणि पनवेल महापालिकेचे अधिकारी उत्तर देऊ शकत नव्हते. महावितरण कंपनीने कळंबोलीतील वीजवाहिनी गटारे व पावसाळी नाल्यातून टाकल्याने भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.