नवी मुंबई : नवी मुंबईतील ऐरोली खाडी किनाऱ्यावर हजारो मृत माशांचा खच जमा झाला आहे. वाढती उष्णता आणि रासायनिक प्रदूषणाने हा प्रकार घडला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अगोदरच माशांचे प्रमाण कमी झाले त्यात  या प्रकाराने मच्छीमार लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

ऐरोली खाडी प्रदूषित झाली असली तरी प्रशासन फारसे गंभीर नाही. असा आरोप नेहमीच स्थानिक मच्छीमार आणि पर्यावरण प्रेमी करत असतात. आज त्याचा प्रत्येय आला आहे. आज (सोमवारी) सकाळी काली, ओलंबी, जितडा , खेकडा, कोळंबी अशा सर्वच प्रकारचे मासे मृत अवस्थेत खाडी किनारी हजारोंच्या संख्येने आढळून आली. विशेष म्हणजे जाळ्यात अडकलेले मासे ही मृत अवस्थेत होते. अशी मच्छी आरोग्याच्या दृष्टीने खाण्यास अयोग्य असल्याने विकत नाहीत. असा प्रकार दर वर्षी होतो. याला सर्वात महत्वाचे कारण म्हणजे डास मारण्यासाठी कांदळवनात फवारणी करणे तसेच रासायनिक रंग असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जन आहे. असा दावा दिनकर पाटील या मच्छीमार व्यावसायिकाने केला आहे. 

dragon drones
रशिया-युक्रेन युद्धात वापरण्यात येणारे नवीन शस्त्र ‘ड्रॅगन ड्रोन’ काय आहे?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
workout pills
Workout Pill: आता जिमला जाण्याची चिंता मिटणार? व्यायामाची गोळी हा काय प्रकार आहे?
bogus medicines in Pune, bogus medicines,
सावधान! पुण्यात बोगस औषधांची विक्री; अन्न व औषध प्रशासनाकडून तीन विक्रेत्यांवर कारवाई
hurricane milton
विश्लेषण: अमेरिकेत यंदा वाढीव चक्रीवादळांचा ‘सीझन’? अजस्र ‘मिल्टन’नंतरही धडकत राहणार संहारक वादळे?
Eyedrop which removes number of spectacles PresVu Eye Drop will replace glasses know about reading vision and computer vision
‘या’ आयड्रॉपचा वापर कराल तर चष्मा विसरून जाल? किंमत फक्त ३५० रुपये, तज्ज्ञ सांगतात ‘असा’ होईल फायदा
cancer vaccine marathi news
विश्लेषण: कर्करुग्णांसाठी आशेचा किरण? नवी लस लवकरच उपलब्ध होणार?
Shivneri Sunadri News
Shivneri : विमानातील हवाई सुंदरी प्रमाणे आता शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’, भरत गोगावलेंची घोषणा

हेही वाचा… मुंबई पोलीस अधिकाऱ्याचा द्रुतगती महामार्गावर अपघाती मृत्यू

याची नुकसान भरपाई गेल्या वर्षी मिळाली मात्र त्यापूर्वी तीन वर्षे मिळाली नव्हती असा आरोपही पाटील यांनी केला आहे. रात्री अपरात्री एमआयडीसीतील रासायनिक उत्पादन आणि वापर करणाऱ्या कंपन्या निरूपयोगी रासायनिक पाणी प्रक्रिया न करता थेट खाडीत सोडतात त्यामुळेही असा प्रकार होतो असा दावा मनसे शहर प्रमुख निलेश बानखिले यांनी केला आहे.