नवी मुंबई: नवी मुंबई शहरात आज ही औद्योगिक पट्यालगत असलेल्या वाशी- कोपरखैरणे विभागात वायू प्रदूषण कायम आहे. मागील आठवड्याभरापासून वाशी, कोपरखैरणे आणि कोपरी विभागात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण जाणवत होते. याबाबत तक्रारी, बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर अखेर प्रदूषण मंडळाने प्रदूषणावर नजर ठेवण्यासाठी वाशी से. २६ मध्ये फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन कार्यान्वित केले आहे.

एकीकडे शहरात स्वच्छता ठेवण्यात येत असली तरी दुसरीकडे सध्या शहरात औद्योगिक कंपन्यांमधून रात्रीच्या वेळी रासायनिक मिश्चित वायू सोडून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण केले जात आहे. रात्री १२ नंतर एमआयडीसी मधील कंपन्या हवेत दूषितवायू सोडत असून याचा त्रास मात्र येथील रहिवाशांना सहन करावा लागत आहे . औद्योगिक वसाहतीतील रबाळे, पावणे येथील कंपन्या थंडीच्या दिवसात धुक्यांचा आसरा घेत मोठ्या प्रमाणावर हवेत रासायनिक मिश्चित वायू सोडतात.

Factors influencing dryland agricultural productivity
कडधान्ये/डाळी पिकविणाऱ्या शेतकऱ्याला “लाडका शेतकरी” म्हणा!
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
What exactly is wealth management
मार्ग सुबत्तेचा : संपत्ती व्यवस्थापन म्हणजे नक्की काय?
wastage of food grains
विश्लेषण: शेतमालाची नासाडी केव्हा थांबणार?
Action of Maharashtra Pollution Control Board against MIDC for pollution of water source in Kurkumbh area Pune print news
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा एमआयडीसीला दणका! कुरकुंभ परिसरातील जलस्रोत प्रदूषित केल्याप्रकरणी कारवाईचे पाऊल
ST employees and officers
बदल्यांमधील गैरप्रकार थांबणार, आता कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्याचा हस्तक्षेप…
Loksatta lokjagar Gadchiroli War situation region Naxal affected areas Police Nilotpal
लोकजागर: गडचिरोलीचे यश!
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट

हेही वाचा… माणुसकी शून्य आणि ओतप्रोत माणुसकी दोन्हीचे दर्शन 

मात्र आता पावसाळ्यात ही मागील आठवड्यापासून एमआयडीसी मधील कंपन्यांचे वायु प्रदूषण करण्याचे सत्र सुरू झाले आहे. रात्री १२ नंतर जेव्हा परिसरातील रहिवाशी निद्रा मनस्थितीत असतात . त्याचवेळी या कंपन्यांकडून हवेत दूषित धुलीकन सोडले जात आहेत. परिणामी रहिवाशांना या वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्री अचानकपणे हवेत जास्त धुळीकण दिसत असल्याचे स्थानिक रहिवाशी यांना जाणवते. हवेत अचानक निर्माण झालेल्या धुळीकणामुळे नागरिकांना उग्र वास येत आहे. त्यामुळे श्वास घेताना अडचणी निर्माण होत आहे. दर्प वासामुळे उलटी, मळमळ सारख्या त्रासांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा… विना परवाना वृक्षतोड करणाऱ्यांना उद्यान विभाग पाठीशी घालत आहे का?

वाशी, बोनकोडे ,कोपरी गाव, कोपरखैरणे, घणसोली हे विभाग औद्योगिक वसाहतीला लागून आहेत. त्यामुळे या विभागात वायुप्रदूषणाचा अधिक परिणाम जाणवत आहे. या विरोधात कारवाई करावी म्हणून वाशी सेक्टर २६ मधील रहिवाशांनी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडे सातत्याने तक्रारी देखील करीत आहेत. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाने सेक्टर २६ मध्ये वायू प्रदूषणाची पातळी मोजण्यासाठी फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन कार्यान्वित केले आहे. या वाहनात स्वंयचलीत यंत्रणा आहे. याद्वारे हवेची गुणवत्ता आपोआप व अचूक मोजली जाणार. यामध्ये प्रदूषण पातळी तसेच कोणते प्रदूषके आहेत यांची नोंद देखील टिपली जाणार आहे. त्यामुळे वायू प्रदूषण करणाऱ्यां सबंधितांवर कारवाई करणे सोयीस्कर ठरेल अशी माहिती प्रदूषण मंडळाने दिली आहे.

वाशी-कोपरी परिसरात वायू प्रदूषणाबाबत तक्रारी येत आहेत. त्यामुळे याठिकाणी फिरते हवा गुणवत्ता तपासणी वाहन कार्यान्वित केले आहे. या वाहनात स्वयंचलित यंत्रणा असल्याने वायू प्रदूषणाची पातळी व त्यामधील प्रदूषके यांची अचूक नोंदी ठेवणार आहे. प्रदूषण पातळी आणि प्रदूषक महिती प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यास सोयीस्कर होणार आहे. – जयंत कदम, उप प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, नवी मुंबई.