लोकसत्ता टीम

उरण : पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणाने नागरीक आणि पर्यटकांनी किनाऱ्यावर येऊ नये आशा सूचना स्थानिक ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. त्यासाठी परिसरात धोक्याचा इशारा देणारे फलक ही लावण्यात आले आहेत.

Shivena Shinde group, rebel in ncp Sharad Pawar,
भाजप, शिवसेना शिंदे गट पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटात बंडखोरी
navi mumbai female police officer commited suicide due to husbands misbehavior and taunts
तू मेलीस तर बरे होईल… पतीच्या टोमण्यांना वैतागूण महिला…
Three killed in accident on Vashi khadi bridge navi Mumbai news
नवी मुंबई: भीषण अपघात तीन ठार
Work of second tunnel in Matheran hill of Baroda Mumbai highway completed
बडोदा मुंबई महामार्गाच्या माथेरान डोंगरातील दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण
Prashant Thakur faces voter anger this election due to ongoing water scarcity and facility issues
तीनवेळा भाजपकडून उमेदवारी मिळूनही पनवेलकरांचे प्रश्न कायम
Belapur vidhan sabha
संदीप नाईक यांचे ‘एकला चालो रे’, समर्थकांना हवी तुतारी… नवी मुंबईतील बंडाची दिशा आज ठरणार ?
Navi Mumbai Polices Cyber Squad uncovered major online fraud gang during a Rs 10 lakh investigation
बनावट कागदपत्रांव्दारे बॅंकखाते बनविणारी टोळी गजाआड, नवी मुंबईच्या सायबर पथकाची कारवाई 
customs superintendent killed and two others injured when they collided with illegally parked tempo
रस्त्यात टेम्पो पार्किंग जीवावर बेतले, अपघातात एक ठार 
navi Mumbai police commissioner
पनवेल: भ्रष्टाचार रोखण्यासाठी आयुक्तांचे बदलीशस्त्र

पिरवाडी किनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यात ही मोठया प्रमाणात पर्यटक येतात. यातील अनेक पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा व लाटांचा अंदाज नसतो,त्यामुळे समुद्रात बुडण्याची शक्यता असते. आशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच जुलै महिन्यातील भरतीच्या वेळी प्रचंड लाटा उसळत असल्याने या धोकादायक परिस्थितीत ही जीवाला धोका निर्माण होत असल्याने पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या स्थानिक नागरीक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नागाव ग्रामपंचायतीने सूचना फलक लावले आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन सरपंच चेतन गायकवाड यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नवीमुंबई पोलीसांच्या सागरी सुरक्षा विभागाचे सुरक्षा कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहेत. मात्र सुट्टीच्या दिवशी पिरवाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे वाहनांची ही तुफान गर्दी होते.