लोकसत्ता टीम

उरण : पावसाळ्यात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षेच्या कारणाने नागरीक आणि पर्यटकांनी किनाऱ्यावर येऊ नये आशा सूचना स्थानिक ग्रामपंचायतीने दिल्या आहेत. त्यासाठी परिसरात धोक्याचा इशारा देणारे फलक ही लावण्यात आले आहेत.

NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
cm Devendra fadnavis marathi news
Supriya Sule : राज्य सरकारवर खासदार सुप्रिया सुळेंचा गंभीर आरोप, म्हणाल्या…!
Hasan Mushrif statement on Kolhapur boundary extension in marathi
कोल्हापूर हद्दवाढीत लोकप्रतिनिधीच आडवे; हसन मुश्रीफ यांचे टीकास्र
Mumbaikars supplied with only clean disinfected water claims mumbai municipal administration
मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेल्या स्वच्छ पाण्याचाच पुरवठा, महापालिका प्रशासनाचा दावा
Nagpur Improvement Trust does not have funds for the road promised by Gadkari
गडकरींच्या वचननाम्यातील रस्त्यासाठी नासुप्रकडे निधी नाही?
Vasai Virar Municipal Solid Waste Management Project marathi news
‘पैसे नाहीत, असे कसे म्हणता?’, महाराष्ट्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
guillain barre syndrome patients pune municipal corporation report survey
‘ त्या ‘ गावांना शुद्ध पाणी पुरविणे गरजेचे, काय म्हंटले नक्की महापालिकेच्या अहवालामध्ये ?

पिरवाडी किनाऱ्यावर सुट्टीच्या दिवशी पावसाळ्यात ही मोठया प्रमाणात पर्यटक येतात. यातील अनेक पर्यटकांना समुद्राच्या पाण्याचा व लाटांचा अंदाज नसतो,त्यामुळे समुद्रात बुडण्याची शक्यता असते. आशा घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच जुलै महिन्यातील भरतीच्या वेळी प्रचंड लाटा उसळत असल्याने या धोकादायक परिस्थितीत ही जीवाला धोका निर्माण होत असल्याने पिरवाडी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या स्थानिक नागरीक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नागाव ग्रामपंचायतीने सूचना फलक लावले आहेत. त्याचे पालन करण्याचे आवाहन सरपंच चेतन गायकवाड यांनी केले आहे. त्याचप्रमाणे नवीमुंबई पोलीसांच्या सागरी सुरक्षा विभागाचे सुरक्षा कर्मचारी ही तैनात करण्यात आले आहेत. मात्र सुट्टीच्या दिवशी पिरवाडी किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे वाहनांची ही तुफान गर्दी होते.

Story img Loader