मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज सोमवारी भाज्यांची नेहेमीपेक्षा आवक जास्त झाली आहे. मात्र टोमॅटोची पावसामुळे उत्पादन खराब होत असल्याने आवक घटली असून दरात ८ते १५ रुपयांची वाढ झाली आहे. गणेशोत्सव आणि मागील आठवड्यात सलग सुट्ट्यांमुळे बाजारात आवक कमी होती. त्याच बरोबर ग्राहक ही रोडवले होते. त्यामुळे बाजरातील भाजीपाला विक्री मंदावली होती. मात्र सोमवारपासून भाजीपाला आवक वाढेल अशी अपेक्षा होती. इतर भाज्यांची आवक वाढली आहे, मात्र पावसामुळे टोमॅटो आवक घटली आहे.

सध्या बाजारात सोलापूर, नाशिक आणि बारामती येथून टोमॅटो दाखल होत आहेत. बाजारात टोमॅटोच्या नित्याने ४० ते ५० गाडी दाखल होत असतात,परंतु मागील आठवड्यातील पावसाच्या मुसळधाराने टोमॅटो उत्पादनावर परिणाम झाला असून बाजारात २५ ते ३०गाड्या दाखल झाल्या आहेत. परिणामी दरात ८ते १५रुपयांची वाढ झाली आहे. मागील आठवड्यात १२ ते १८ रुपयांनी उपलब्ध असलेले टोमॅटो आता २५ ते २६ रुपयांवर गेले आहेत.पावसामुळे टोमॅटो खराब झाले असून बाजारात आवक कमी झाली आहे. येत्या कालावधीत टोमॅटोचे ५०%उत्पादन खराब होईल परिणामी दर आणखीन वधारतील ,असे मत व्यापारी व्यक्त करीत आहेत.

rain Mumbai , Mumbai rain news, Mumbai latest news,
मुंबईत पुढील तीन ते चार तासांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
Meteorological department predicted rain in Mumbai
मुंबईत रविवारी हलक्या सरींचा अंदाज
Mumbai Municipal Corporation approved three and a half thousand applications under Water for All Policy Mumbai
मुंबई: ‘सर्वांसाठी पाणी धोरणा’अंतर्गत साडेतीन हजार अर्ज मंजूर
What is the mystery of the sound coming from the forest in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यातील जंगलातून येणाऱ्या आवाजाचे गूढ काय?
plaque noted 108 lost ambulances at Borgaon Health Centre garlanded during rainy protest
नाशिक : बोरगावात रुग्णवाहिकेसाठी आंदोलन
Central Railway stopped due to heavy rains Mumbai
संध्याकाळी मुसळधार; मुंबईसह ठाणे, पालघर जिल्ह्यांना पावसाने झोडपले

हेही वाचा : पनवेल : शेकाप, राष्ट्रवादी पोखरुन शिंदेगट होतोय बळकट

एपीएमसी बाजारात सोमवारी भाजीपाला आवक वाढली आहे. परंतु पावसामुळे टोमॅटो आवक कमी झाली आहे.बाजारात सोमवारी २५ ते ३० गाड्या दाखल झाल्या आहेत.त्यामुळे ५% दरवाढ झाली आहे. – श्रीकांत पाटील, व्यापारी, एपीएमसी