टीम लोकसत्ता

नवी मुंबई: स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान करणाऱ्या काँग्रेसचा निषेध करण्यासाठी आणि सावरकरांचे कार्य पुन्हा एकदा जनतेपर्यंत आणि युवा पिढी पर्यंत पोहोचवण्यासाठी नवी मुंबईमध्ये आज नवी मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. या गौरव यात्रेमध्ये हजारो सावरकर प्रेमी नागरिकांनी रणरणत्या उन्हातही सहभाग घेतला. आमदार गणेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती या गौरव यात्रेला लाभली. त्यांच्यासह माजी खासदार संजीव नाईक, ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक, नवी मुंबई महापालिकेचे माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर जयवंत सुतार यांच्यासह आदी मान्यवरांनी या गौरव यात्रेत भाग घेतला.

Vanchit Bahujan aghadi agitation against senior literary figure in Nagpur
नागपुरातील ज्येष्ठ साहित्यिकाच्या विरोधात वंचितचे आंदोलन, निवासस्थानी पोलीस तैनात
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
jayant patil secret explosion on bhagyashree atrams entry in sharad pawar ncp
गडचिरोली : “राष्ट्रवादीतील फुटीनंतर भाग्यश्री आत्राम शरद पवारांच्या संपर्कात,”जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट
sanjay raut reaction on amit shah mumbai statement
“बॉम्बेचं मुंबई करण्यात तुमचं योगदान असेल, तर…”; ‘त्या’ विधानावरून संजय राऊतांचा अमित शाह यांच्यावर हल्लाबोल!
Satara, Ganesha welcome Satara, Satara latest news,
साताऱ्यात ‘मोरया’चा जयघोष, वाद्यांचा गजर; गणरायांचे उत्साहात स्वागत
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?
Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून

वाशी येथील हॉटेल ब्लू डायमंड पासून स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेला ढोल-ताशांच्या गजरात आणि सावरकरांच्या देशभक्तीपर गाण्यांनी शुभारंभ झाला. यात्रेत सहभागी सावरकर प्रेमींनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यांनी वातावरण भगवेमय झाले होते. ‘ मी सावरकर’ आणि ‘आम्ही सारे सावरकर’ घोषवाक्य असलेले फलक सावरकर प्रेमींनी हातात धरले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जयघोष, वंदे मातरम, भारत माता की जय, अशा घोषणा देत ही गौरव यात्रा वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये पोहोचली. या ठिकाणी झालेल्या सांगता सभेमध्ये आमदार गणेश नाईक यांनी देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सर्वोच्च पणाला लावले. जाज्वल्य राष्ट्रभक्ती असतानाही काही प्रवृत्ती त्यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य करीत आहेत. हे आरोप करणाऱ्यांचे दुर्भाग्य आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशासाठी दिलेले योगदान कोणीही विसरू शकणार नाही असे सांगून नाईक यांनी आजच्या युवा पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकरांची देशभक्ती आणि मातृभक्ती याविषयीचे प्रेरणादायी विचार आणि त्यांचे कार्य समजावे यासाठी आजच्या गौरव यात्रेचे आयोजन केल्याचे सांगितले.

आणखी वाचा- नवी मुंबई: जेव्हा महाराष्ट्रातील सायकलपटू ईशान्येतील मुलांसाठी प्रेरणास्थान बनते

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान देश सहन करणार नाही असा इशारा देण्यासाठी शिवसेना, भाजपा आणि सावरकर प्रेमींनी आजची गौरव यात्रा आयोजित केल्याचे नमूद केले. स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी आणि स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्याचा सन्मान केला असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी मात्र वारंवार सावरकरांचा अवमान करीत आहेत. हा अपमान आता खपवून घेतला जाणार नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य युवा पिढीसाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी असून स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य आजच्या युवा पिढीसाठी दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन ऐरोली विधानसभा क्षेत्राचे प्रथम आमदार संदीप नाईक यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सावरकरांचा सिंहाचा वाटा तर होताच शिवाय समाज सुधारक म्हणून देखील त्यांचे कार्य मोठे आहे. अस्पृश्यता निवारण, स्वदेशीचा पुरस्कार, सदृढ समाजासाठी युवकांमध्ये व्यायाम प्रसार आणि प्रचार या विषयात त्यांनी क्रांतिकारी कार्य केले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गैरसमज पसरविण्याचे काम काही प्रवृत्ती करीत आहेत. त्याचे खंडन केले पाहिजे.

आणखी वाचा- नवी मुंबई महापालिका मालामाल, यंदा ६३३.१७ कोटी रक्कमेची विक्रमी वसुली

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आणि कार्य कोणी पुसण्याचा विचार केला तरी ते शक्य नाही. काही पक्ष घाणेरडे राजकारण करीत आहेत स्वातंत्र्याचा इतिहास माहित आहे.त्यामुळे सावरकरांचा अपमान यापुढे कधीही खपवून घेतला जाणार नाही असा नाईक यांनी दिला.