नवी मुंबई : तुम्ही घर पाडायचे ते आम्ही बांधायचे कौल चढवायचे आणि पुन्हा ते घर आदेश येताच तुमच्या ताब्यात द्यायचे हे आता चालणार नाही. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश आमले यांनी खंत व्यक्त करत अपक्ष बेलापूर विधानसभा लढण्याचा निर्णय त्यांनी वाशीतील मेळाव्यात जाहीर केला. मला निवडणुकीची तयारी करा असा आदेश आला मात्र अचानक संदीप नाईक यांनी प्रवेश करताच मला बाजूला सारले असा दावाही त्यांनी केला

नवी मुंबईत गेल्या काही दिवसात सातत्याने धक्कादायक राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते मंगेश आमले यांनीही बंडाचे निशाण फडकावले आहे. आज वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला आहे. 

हेही वाचा – तू मेलीस तर बरे होईल… पतीच्या टोमण्यांना वैतागूण महिला पोलीसाची आत्महत्या  

अनेक वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करत आहे. २०१९ मध्ये एका कुटुंबाने दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याने राष्ट्रवादी रिकामी झाली त्यावेळी आम्ही १० लोक शरद पवार यांना भेटून आम्ही पक्ष पुन्हा उभा करू असे पवारांना आश्वासीत केले. पक्षाच्या पडत्या काळात संघटन केले जागावले. २०१९ मध्ये कामाला लागा म्हणून सांगितले अचानक शांत बसण्यास सांगितले या वेळेससुद्धा निवडणूक कामाला लागा सांगण्यात आले, जोमाने कामाला लागलो, घरोघरी तुतारी पोहचवली. मागच्या आठवड्यापर्यंत घर बांधत आणले कौल टाकले निवडणुकीत पक्षातील कोणालाही तिकीट मिळाले असते तरी चालले असते जोमाने कामाला लागलो असतो. मात्र इथेही तेच झाले ज्यांनी पक्ष संपवला त्यांनाच संधी देण्यात आली. घर आम्ही बांधले आणि ताबा ज्यांनी पूर्वी घर पाडले त्यांच्या ताब्यात दिले. त्यामुळे अगतीत भावनेतून निर्णय स्वीकारला. असे आमले यांनी आपल्या भाषणात मन मोकळे केले आणि शेवटी निवडणूक अपक्ष लढण्याचा निर्णय जाहीर केला.  

हेही वाचा – नवी मुंबई: भीषण अपघात तीन ठार

नवी मुंबईत जुन्नर आंबेगाव पुणे परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात राहण्यास आहे. त्यात आमले यांना मिळणारा प्रतिसाद पाहता या भागातील मते अपेक्षित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार संदीप नाईक यांना धोक्याची घंटा आहे.