नवी मुंबई : संचालक मंडळाचा कोरम पूर्ण होत नसल्याने एपीएमसीत संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक का नेमु नये ? याबाबत उर्वरित ८ संचालकांना पणन विभागाने करणे दाखवा नोटीस बजावली होती.  ११मे ला सुनावणी घेण्यात येणार होती. मात्र संचालक मंडळ बरखास्त करण्याला सदस्यांचा विरोध आहे. नागपूर येथील संचालक सुधीर कोठारी यांनी पणन विभागाच्या या निर्णय प्रक्रियेविरोधात न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर न्यायालयाने ६ जूनपर्यंत पणन विभागाच्या सुनावणी प्रक्रियेला स्थगिती दिली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई शहरात प्रक्रियायुक्त पाण्याचा वापर आता शौचालयासाठीही! कोपरखैरणे प्रक्रिया केंद्रातून घणसोलीतील सार्वजनिक शौचालयात पाणीवापर सुरू  

medicine, illegal advertising, court ,
दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींप्रकरणी समन्स
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
lavasa loksatta news,
लवासा प्रकरण : सीबीआय चौकशीची मागणी कशाच्या आधारे ? उच्च न्यायालयाची याचिकाकर्त्यांना विचारणा
scam in hoardings revenue in palghar news update
शहरबात : बॅनरचे उत्पन्न गेले कुठे?
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
congress leader vijay wadettiwar reacts on criminal in santosh deshmukh murder case
“संतोष देशमुख प्रकरणात आरोपींना पाठीशी घालणारे नालायक…”, वडेट्टीवार यांची टीका
Supreme Court On Mahakumbh Stampede
Supreme Court : “ही दुर्दैवी घटना, पण…”, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेवरील सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाचा नकार, याचिकाकर्त्याला दिले ‘हे’ आदेश
pil filed in High Court demanding ED inquiry into Valmik Karad accused in Santosh Deshmukhs murder
वाल्मिक कराडच्या आर्थिक व्यवहारांच्या ईडी चौकशीचे आदेश द्या, जनहित याचिकेद्वारे उच्च न्यायालयात मागणी

राज्यात अनेक महापालिकेत निवडणूका झाल्या नसल्याने प्रशासक सत्ता आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील संचालक मंडळ पूर्ण नसल्याने अकार्यक्षम असल्याचे कारण पुढे करून संचालक मंडळ बरखास्त करण्याचा पणन संचालकांचा मनसुबा होता. मात्र याला नागपूर येथील सुधीर कोठारी यांनी नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. पणन संचालकांनी महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास आणि विनियमन) अधिनियम, १९६३ च्या कलम ४५(१) अन्वये जारी केलेली नोटीस (थोडक्यात “१९६३ चा कायदा”) कायद्याच्या कलम ५८ अन्वये कोणतेही अधिकार नसताना दिली आहे. त्यामुळे पणन विभागाच्या या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी याचिका दाखल करण्यात आली. यावर न्यायालयाने ११ मे ला होणाऱ्या सुनावणीस स्थगिती दिली आहे.  पुढील सुनावणी ६ जूनला असून तोपर्यंत स्थगितीचे आदेश दिले आहेत. संचालक मंडळाच्या निर्णयाचा पेच आणखीन वाढला असून बाजारात धोरणात्मक निर्णय, विकास कामे मात्र अधांतरीच राहिले आहेत.

Story img Loader