नवी मुंबई : नवी मुंबईतील पामबीच मार्गालगतच्या पाणथळींना लागून खाडीकडील बाजूस असलेले काही एकर आकाराचे एक मोठे बेटच निवासी संकुलांसाठी खुले करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. या पाणथळी म्हणजे लाखो फ्लेमिंगोंचा अधिवास असून त्या बिल्डरांसाठी खुल्या करण्याचा नवी मुंबई महापालिकेचा निर्णय आधीच वादात सापडला असताना, सिडकोच्या या नवीन निर्णयामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे.

नैसर्गिक पाणथळी आणि ठाणे खाडी किनाऱ्याच्या मधोमध असलेल्या या ‘करावे द्वीपा’च्या नियोजनाचे संपूर्ण अधिकार राज्य सरकारने २०१७ मध्ये सिडकोकडे सोपविले होते. लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना मार्च २०२४ मध्ये सिडकोने ‘करावे द्वीपा’चा प्रारुप विकास आराखडा जाहीर केला. निवडणुकांच्या हंगामातच यासंबंधीच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या. आराखड्यानुसार, सिडकोने या द्वीपावरील विस्तीर्ण उद्यानासाठी असलेले आरक्षण बदलून ते रहिवासी वापरासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.

navi mumbai cracks on flyover
नवी मुंबई: २६ वर्षांत उड्डाण पुलाला तडे, वाहतूक बंद 
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
navi mumbai crime news
नवी मुंबई: माझ्या मुलाला न्याय द्या, आईची आर्जवी मागणी; मात्र शाळा प्रशासन, पोलीस आणि रुग्णालय उदासीन 
Panvel Demolition Video
“हरले म्हणून गरिबाला त्रास..”,पनवेलमध्ये झालेल्या कारवाईचा संबंध योगी आदित्यनाथ यांच्याशी का जोडला जातोय? पाहा Video
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Mumbai local 24 years ago old video goes viral
मुंबई लोकलमध्ये २५ वर्षांपूर्वी किती गर्दी असायची? सोशल मीडियावर व्हायरल झालेला Video पाहाच
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”

हेही वाचा >>> शरद पवारांकडून प्रशांत पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन, उरणच्या घरी दिली भेट

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाची हक्काची ठिकाणे सीवूड्स, बेलापूर पट्ट्यात तयार झाली आहेत. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र. या जागा पाणथळींच्या नसल्याचा सिडकोचा युक्तिवाद आहे.

मध्यंतरीच्या काळात, खाडीच्या मार्गात बेकायदा बांध टाकून या पाणथळी कोरड्या करण्याचे प्रयत्नही करण्यात आले होते. शेकडो कोटी रुपये किमतीच्या या जमिनींवर देशातील एका बड्या उद्याोजकाचा डोळा असल्याची चर्चाही होत असते. त्यामुळेच पाणथळीच्या या जागा मोकळ्या करून त्यावर निवासी संकुले उभारण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सिडकोच्या निर्णयासंबंधी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सविस्तर माहिती घेऊन सांगते असे उत्तर दिले.

द्वीपच बिल्डरांसाठी खुले

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ३१ ऑक्टोबर २०१७ रोजी नगरविकास विभागाने एक आदेश काढत नवी मुंबई महापालिका हद्दीतील काही भागांच्या विकासाचे विशेष अधिकार सिडकोला सुपूर्द केले. यामध्ये पामबीच मार्गालगत खाडीकडील बाजूस असलेल्या ‘करावे द्वीपा’च्या काही एकर क्षेत्राचा विकासही गृहीत धरण्यात आला. त्या वेळी संपूर्ण द्वीप मध्यवर्ती उद्यानासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पाणथळींच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याच्या निर्णयावर वाद सुरू असताना ‘करावे द्वीप’च बिल्डरांसाठी खुले होईल असा विचारही कोणाच्या ध्यानीमनी नव्हता.

सीआरझेड, पोहोच रस्त्यांचा अडथळा?

जमिनीच्या विकासात सीआरझेडचा अडथळा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच द्वीपाच्या दिशेने जाण्यासाठी भराव टाकून पाणथळीच्या या जागा बुजवून पोहोच रस्ते करता येणार आहेत. असे झाल्यास फ्लेमिंगोचा मोठा अधिवास बुजविला जाईल अशी भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत.

‘करावे द्वीप’ आणि आसपासच्या परिसरात एक प्रकारची पर्यावरणीय व्यवस्था उभी राहिली आहे. या निर्णयामुळे पाणथळींच्या जागा, खारफुटी, पक्ष्यांचा अधिवास तसेच खाडीलगतचे संपूर्ण पर्यावरण नष्ट करावे लागणार आहे. राज्य सरकार पर्यावरणच्या दृष्टीने सजग आहे असे म्हणत इतका संवेदनशील पट्टा उखडून टाकण्यासाठी वेगाने पावले उचलते, हे धक्कादायक आहे.

सुनील अग्रवालसंस्थापक, ‘सेव्ह नवी मुंबई फोरम’